
लोटे परशुराम एमआयडीसीत पाणीसंकट गडद; पुढील 48 तासांत आणखी उद्योग बंद पडण्याची शक्यता
पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्यामुळे उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवणे अशक्य बनले आहे. रासायनिक आणि औषधनिर्माण उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पाण्याअभावी उत्पादन यंत्रणा चालविणे, कूलिंग सिस्टिम, रासायनिक प्रक्रिया आणि इतर अत्यावश्यक कामे ठप्प झाली आहेत. घरडा केमिकलचे सर्व युनिट्स बंद झाल्याने हजारो कामगार, कंत्राटी कर्मचारी आणि उद्योगाशी संबंधित वाहतूक, पुरवठा व सेवा क्षेत्रातील व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक कामगारांच्या रोजगारावर तात्पुरते संकट निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
पावसाळा तोंडावर, तरीही पाणीप्रश्न कायम, आडेलीतील नागरिकांचा प्रशासनावर संताप
दरम्यान, लोटे एमआयडीसीमधील इतर अनेक मोठ्या आणि मध्यम उद्योगांकडेही पाण्याचा साठा अत्यल्प प्रमाणात उरल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पुढील 24 ते 48 तासांत पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारली नाही, तर आणखी अनेक कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. लोटे औद्योगिक वसाहतीत रासायनिक, औषधनिर्माण आणि विविध उत्पादन क्षेत्रातील शेकडो उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमुळे हजारो कुटुंबांचा रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्था चालते. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याने केवळ उद्योगच नव्हे, तर संपूर्ण परिसराच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या उद्योग व्यवस्थापन, एमआयडीसी प्रशासन आणि संबंधित विभागांकडून पर्यायी पाणीपुरवठ्याचे पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर लोटे एमआयडीसीसमोरील संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत. उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी प्रशासन आणि राज्य सरकारकडे तातडीने पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोटे एमआयडीसीतील उद्योग बंद पडण्याच्या उंबरठ्यावर असताना, उद्योगमंत्र्यांच्या मतदारसंघातच अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता सरकार आणि संबंधित यंत्रणा या संकटावर किती लवकर मात करतात, याकडे उद्योग क्षेत्रासह हजारो कामगारांचे लक्ष लागले आहे.
पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवणे अशक्य बनले आहे. त्यामुळे घरडा केमिकल व्यवस्थापनाने तातडीने सर्व युनिट्समधील कामकाज थांबविण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम हजारो कामगार, कंत्राटी कर्मचारी आणि उद्योगाशी संबंधित व्यवसायांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, एमआयडीसीतील इतर अनेक मोठ्या आणि मध्यम उद्योगांकडेही पाण्याचा साठा अत्यल्प प्रमाणात शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार पुढील 24 ते 48 तासांत परिस्थिती सुधारली नाही तर उर्वरित कंपन्यांनाही उत्पादन बंद करावे लागू शकते.लोटे औद्योगिक वसाहतीत रासायनिक, औषधनिर्माण आणि विविध उत्पादन क्षेत्रातील शेकडो उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांना दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे उद्योग व्यवस्थापनासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.