
रत्नागिरी कातळशिल्प
बैठकीस आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कामकाजाची सविस्तर माहिती दिली. यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हयातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन अधिका-यांना आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कातळशिल्पाच्या आराखड्यासाठी पुरातत्व विभागाने जिल्हाधिका-यांपुढे सादरीकरण करून तातडीने मान्यता घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. याशिवाय गणपतीपुळे, आरे-वारे, नेवरे, माडवी व भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांसाठी सुसज्ज फूडस्टॉल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या आवारात जागा उपलब्ध असल्यास अंगणवाडी बांधकामासाठी सर्व शाळांचे सर्वेक्षण केले जाईल. सामाजिक व इतर उपक्रमांतर्गत ‘शुभमंगल सामूहिक नौदणीकृत विवाह योजना’ प्रभावीपणे राबवून यावर्षी जिल्ह्यात किमान ५० जोडप्यांचे ५ सामूहिक विवाह आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी महिला व बालविकास आणि समाज कल्याण विभागाने संयुक्तपणे पुढाकार घ्यावा.
Ratnagiri मध्ये १ लाख ३१ हजार मतदार नावे वगळली; SIR प्रक्रियेत दावे व हरकती…
पोलीस विभागाच्या श्वान पथकासाठी वातानुकूलित वाहन उपलब्ध करून दिले जाईल, तसेच भविष्यातील १५ श्वानांची क्षमता विचारात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा प्रस्ताव सादर करावा, या बैठकीत जिल्हा शासकीय रुग्णालयातील औषध खरेदी, खैराच्या रोपांचे वाटप आणि शासकीय इमारतीच्या बांधकामाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.