
वय ओलांडलेल्या तरुणांची संख्या
गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण
गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण
संगमेश्वर: कोकणाचा दहावी-बारावीचा निकाल राज्यात नेहमीच आघाडीवर असतो. ९० ते १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे मोठी असून त्यात मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. मेहनत, सातत्य आणि शिक्षणाची आवड यामुळे कोकणातील मुली शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणापर्यंत सहज पोहोचतात. मात्र याच शिक्षणप्रगतीमुळे कोकणात एक गंभीर सामाजिक प्रश्न उभा राहत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. उच्च शिक्षणानंतर कोकणात पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बहुसंख्य मुली शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे वळतात. नंतर नोकरी लागली की शहरातील जीवनशैलीशी त्या रमतात.
गावात राहणारा नवरा नको
एकदा शहरातील स्थैर्य मिळाले की पुन्हा गावाकडे परतण्याची तयारी फारशा मुली दाखवत नाहीत. शेती, बागायती किया गावातील जीवनपद्धतीपेक्षा शहरी जीवनशैलीचे आकर्षण अधिक प्रभावी ठरते. लग्नाचा विषय पुढे आला की गावात राहणारा नवरा नको, ही भूमिका अधिक ठाम होते. सुरुवातीला कोकणातीलच, पण शहरात राहणाऱ्या मुलाशी लग्न करण्याचा विचार असायचा. आता मात्र तोही बदलला आहे. पालकही मुलीचे शिक्षण, नोकरी आणि ‘सेटलमेंट’ पाहून फारसे आक्षेप घेत नाहीत.
‘लग्न घडी समीप आली अन् नियतीने…’! सुखी संसार सुरू होण्याआधीच संपला; नाशिकमध्ये नववधूचा थेट…
गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण
दुसरीकडे, मूलाव्या बाबतीत चित्र वैगळे आहे. मुलीच्या तुलनेत अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी असल्याने अनेक जण उच्च शिक्षणापर्यंत पोहोचत नाहीत. काही अपवाद वगळता बहुतेक तरुण गावातब राहतात. वडिलोपार्जित शेती, बागायती, घरांची जबाबदारी, कुटुंबाचा व्यवसाय, किया शहरात स्वतःचे घर नसल्याने गावीच स्थायिक राहण्याचा निर्णय है तरुण घेतात. शिक्षित असला तरी गावात राहणाऱ्या तरुणहशी शहरात स्थिरावलेली मुलगी संरखर मांडायला तयार नसल्याचे वास्तव वारंवार समोर येते.
गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण मोठ्या संख्येने अविवाहित राहिले आहेत. एखाद्या वाडी-वस्तीतील ३०-३५ घरांमध्ये १०-१२ तरुण लग्नाचे वय ओलांडलेले दिसतात, तर त्याच ठिकाणी लग्नयोग्य वयाच्या मुली एक-दोनच असतात, त्या मुलीदेखील गावातच राहणाऱ्या तरुणाशी लग्न करण्यास फारशा इच्छुक नसतात. परिणामी अनेक तरुणांचे वय ३५-४० वर्षे उलटूनही लग्न होत नाही. एकत्र आले की आपले पुढे काय?’ हा प्रश्न त्यांच्या चर्वेचा विषय ठरतो, काहींनी तर आई-वडिलाना सांगून लग्नाचा विचारच सोडून दिला आहे आणि वास्तव स्वीकारून आयुष्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.