Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: चिपळूणबाबत आमदार शेखर निकम यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार: उदय सामंतस यांचे वक्तव्य

Uday Samant: पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री सामंत यांनी राजणगाव एमआयडीसीतील प्रदूषणाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. तसेच त्यांनी दिल्ली भेटीवर देखील टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 21, 2025 | 01:39 PM
Ratnagiri News: चिपळूणबाबत आमदार शेखर निकम यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार: उदय सामंतस यांचे वक्तव्य

Ratnagiri News: चिपळूणबाबत आमदार शेखर निकम यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार: उदय सामंतस यांचे वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:
  • २१ नोव्हेंबर निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस
  • रांजणगाव एमआयडीसीमधील प्रदूषणावर केलं भाष्य
  • बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडेंनाही निमंत्रण देणार
वैभव खेडेकर हे पूर्वीपासूनच माझे चांगले मित्र आहेत. परंतु ते सध्या भाजपात काम करीत आहेत. मी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अशी विनंती केली होती की युती करायची असेल तर ती प्रामाणिकपणाची असायला हवी. त्यामुळे ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार भाजपाच्या उमेदवारांसमोर उभे आहेत आणि ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारांसमोर उभे आहेत. त्यांनी माघार घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे माझी माहिती अशी आहे की बऱ्यापैकी असे बंडखोरीचे उमेदवारी अर्ज मागे घेतले जात आहेत आणि २१ नोव्हेंबर निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी युती बाबतचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

कोल्हापुरातील रस्त्याचा विषय थेट उच्च न्यायालयात; कोर्टाने नोटीसच केली जारी

आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा होईल – मंत्री सामंत

मंत्री सामंत म्हणाले की, चिपळूणबाबत आपली तेथील आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा होईल. महायुतीबाबत ते सकारात्मक आहेत आणि यातून चर्चा पुढे जाऊ शकेल आणि त्यातून चांगले आउटपुट निघेल असा मला विश्वास आहे. राजेश सावंत यांच्या पत्रकार परिषदेवर मी कशाला बोलू? मला त्यांच्यावर काहीही बोलायचे नाही, असे म्हणत, त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. (फोटो सौजन्य – Pinterest)

रांजणगाव प्रदूषणाबाबत १५ दिवसांत घेणार बैठक

कणकवलीच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, कणकवलीत फक्त शहर विकास आघाडी आहे आणि कालची सभा बघितल्यानंतर संदेश पारकर नक्की आघाडीवर आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी रांजणगाव एमआयडीसीमधील प्रदूषण, आगामी निवडणुकांमधील युतीचे चित्र आणि विरोधकांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

पालकमंत्री सामंत यांनी राजणगाव एमआयडीसीतील प्रदूषणाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले. येत्या १५ दिवसांत रांजणगावच्या प्रदूषणाच्या बाबतीत बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. मी स्वतः ग्रामस्थांसोबत त्या ठिकाणी फिरलो आहे, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन सामंत यांनी दिले.

Ladki Bahin Yojana : वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत

दिल्ली भेटीवर टोला

एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, तेव्हा नरेंद्र मोदी याच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात आणि (विरोधी) त्यांचे नेते दिल्लीत गेले तर कुठे बसतात, हे सर्वांना चांगलेच माहिती आहे. तसेच राहुल गांधीच्या नादाला लागले तर काय होते, हे विधानसभेत आणि परवाच्या लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षाच्या अपयशावर निशाणा साधला.

Web Title: We will discuss with shekhar nikam as soon as possible about chiplun uday samant said ratnagiri news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • Marathi News
  • Ratnagiri
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत
1

Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत

‘निर्धार’ चित्रपटाचा  ट्रेलर पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता, जाणून घ्या चित्रपट कधी होणार रिलीज?
2

‘निर्धार’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता, जाणून घ्या चित्रपट कधी होणार रिलीज?

Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे
3

Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे

‘बहर नवा’ या गाण्यातून खुलवणारा नव्या नात्यातील दरवळ, ‘असंभव’मधील पहिलं गाणं प्रदर्शित
4

‘बहर नवा’ या गाण्यातून खुलवणारा नव्या नात्यातील दरवळ, ‘असंभव’मधील पहिलं गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.