
Rohit Pawar Allegations, Praful Patel, Sunil Tatkare, NCP Party Split, Black Magic Controversy,
रोहित पवार म्हणाले, म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त १८ दिवस झाले होते आणि १६ फेब्रुवारी रोजी हे पत्र सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थ पवारला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता निवडणूक आयोगाला देण्यात आले. विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अजितदादांची ताकद आणि पक्षाचे पूर्ण अधिकार प्रफुल्ल पटेल यांना दिले. हे सुनेत्रा काकींना कळले असणार आणि त्यांनी लगेच पत्रव्यवहार केला.
रोहित पवार म्हणाले, “अजितदादा जीवंत असताना त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केले जाते. कदाचित नाशिकचाच जो भोंदूबाबा आहे, त्यानेच तिथे काळी जादू करण्याचा प्रयत्न केला होता का? याच्यामागे पक्षावर ताबा मिळावा, हा हेतू होता का? त्यानंतर २८ तारखेला अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला, है आम्ही शोधत आहोतच. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे दौन दिवसांत पीयूष गोयल यांचे स्टेटमेंट येते की, प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. पण, क्रमवारी बघितली तर असे दिसते की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही मोठ्या इतर पक्षाच्या नेत्यामध्ये या गोष्टी आधीच ठरल्या होत्या. हे आधीच ठरले होते की पक्षाचा कंट्रोल घ्यायचा आहे, तर मग जेव्हा अजितदादांचा अत्यविधी होत होता तेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तिथे आले. काय हेतू, घेऊन तिथे आले होते? त्याच्यामागे २७ तारखेच्या बैठकीचादेखील काय हेतू होता? या सगळ्या गोष्टीचा तपास केला गेला पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली.
दप्तराच्या वाढत्या ओझ्याविरोधात मनसे आक्रमक! विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम
रोहित पवार म्हणाले, हे सगळे डॉक्युमेंट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून मी समोर आणेल, पण, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता, कारण अजितदादा असताना जे फालतू खर्च होते, नरेश आरोरावरचा खर्च असेल, इतर काही खर्च असतील, काही गोष्टी पक्षात चुकीच्या होत होत्या, काही लोकांचे कर्तृत्व नसतानाही मोठमोठी पदे देण्यात आली होती, दादा कार्यकर्त्यांचे, आमदारांचे ऐकत होते. पण, या लोकांचे ऐकत नसल्यामुळे मग या लोकांनाच असे पाहिजे होते का की सपूर्ण पार्टीच आपल्या हाती यावी. आणि मग अजितदादांचा अपघात होणे, पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणे आणि सुनेत्रा काकींना है सगळे कळणे, आता सुनेत्रा काकीना एवढेच मला सांगायचे आहे की, राजकारण लय वंगाळ झालेले आहे.