
Sensational Claim by Rohit Pawar: 70 Officers and Women Involved in Nashik’s Ashok Kharat Scanda
Rohit Pawar Criticized Mahayuti Government : “राज्यात भोंदूगिरीला राजकीय पाठबळ मिळत असून त्यामुळेच अशा प्रकारची प्रकरणे वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. “महाराष्ट्रात सध्या गलिच्छ राजकारण सुरू असून ते कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे,” अशा खरमरीत शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार Rohit Pawar यांनी सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल केला. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणावरून राज्यात दिवसेंदिवस धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात भोंदूगिरीला खतपाणी मिळाले आहे. “एखादा भोंदू बाबा शून्यातून सुरुवात करून दोन हजार कोटींचा मालक होतो, हे सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, प्रतिगामी आणि मनुवादी विचारसरणीमुळे भोंदूगिरी वाढीस लागली असून सरकारकडून अशा प्रवृत्तींना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुण्यातील गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात अपघात; PMP बसचे ब्रेक अचानक फेल,
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी धक्कादायक बाब मांडली. या प्रकरणात सुमारे ७० अधिकारी आणि महिलांचे व्हिडिओ असल्याचे समोर आले असल्याचा दावा त्यांनी केला. “सामान्य महिलांचे व्हिडिओ बाहेर येतात, पण नेत्यांचे व्हिडिओ कुठे जातात?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
रोहित पवार यांनी डी-लिमिटेशन कायद्यावरही सरकारवर जोरदार निशाणा . हा कायदा जबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकार तुमचे असताना भाजपच मुंबईत आंदोलन करत आहे, ही विचित्र परिस्थिती आहे,” असे ते म्हणाले. या आंदोलनामुळे मुंबईतील नागरिकांना दोन-दोन तास अडचणींना सामोरे जावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.
उन्हाचा वाढतोय तडाखा; पाणी टंचाई तीव्र, नाशिकमध्ये 162 गावांना टँकरने पाणी
“आंदोलन करायचे असेल, तर शेतकऱ्यांसाठी करा. राज्यात शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, वरून आदेश आल्याशिवाय आंदोलन केले जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजपच्या विचारसरणीत भोंदूगिरी करणाऱ्यांना पाठिंबा दिला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. बलात्कार प्रकरणात तुरुंगात गेलेल्या Asaram Bapu यांना काही लोक समर्थन देतात. याउलट, भागवत संप्रदाय पुढे नेणाऱ्या संत-महाराजांना अपेक्षित समर्थन मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “पाच-पाच कोटी रुपये घेऊन महाराष्ट्रात येणारे काही महाराज Sant Tukaram महाराजांबद्दल चुकीचे बोलतात, तरीही कोणी प्रतिक्रिया देत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यात भोंदूगिरीला प्रोत्साहन देत वारकरी संप्रदाय कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.