
Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरीसाठी गेलेल्या महिलांसह 8 जणांचा ट्रकने चिरडलं
या भीषण अपघातात सहा आठ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे ज्यातील सहा महिला मजूर होत्या. सांगण्यात येत आहे की, महिला समृद्धी महामार्गाच्या सफाईचे काम करत असून नेहमीप्रमाणे त्या आपलं काम करायला गेल्या आणि काम आटोपून घरी येत असतानाच त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या पिकअप व्हॅनला जोरदार धडक मारली ज्यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. दाव्यानुसार, अपघातानंतर पोलिस घटनास्थळी फार उशीरा पोहचले. यावरुन आता स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. दरम्यान अपघाताचे नेमके कारण काय होते ते अजूनही समोर आलेले नाही. या अपघातानंतर पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर वाढत असणाऱ्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड
हा अपघात झाल्यानंतर मदतीसाठी पोलीस घटनास्थळी उशीरा पोहोचले, असा आरोप होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक संतापले होते. या अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताची नोंद घेत ट्विट करत मदतीची घोषणा केली. यात त्यांनी लिहिले की, “जालनाच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ही अत्यंत दुःखद घटना आहे. मी मृतकांना श्रद्धांजली अर्पण करतो. आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. जखमींवर उपचार सुरू असून, स्थानिक प्रशासन समन्वय साधत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल.”