Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: अयोध्येचा अंडरवर्ल्ड चालवणारा ‘दाऊद’ कोण…? संजय राऊतांचा गंभीर आरोप

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्याबद्दल तडीपार करण्याची कारवाई होत असेल, तर या देशात लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही. फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना तडीपार करायचं, हेच सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 03, 2026 | 02:23 PM
Sanjay Raut, Shiv Sena UBT, Mumbai BJP, Mumbai Rains, BMC , Ayodhya, Ram Mandir, Maharashtra Politics,

Sanjay Raut, Shiv Sena UBT, Mumbai BJP, Mumbai Rains, BMC , Ayodhya, Ram Mandir, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:

Sanjay Raut News: देशाला कलंकित करणाऱ्या घटना अयोध्येत घडत आहेत. प्रभू श्रीरामाच्या नावाने देशाची अस्मिता उंचावली गेली, पण आज अयोध्येत अंडरवर्ल्डसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने अयोध्येत गुंड आणि दरोडेखोरांचं राज्य निर्माण केलं आहे. राम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं असून त्यामध्ये भाजपशी संबंधित लोकांची नावं आहेत.” अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, “लोकांच्या मनात चीड आणि अस्वस्थता आहे, पण दहशतीमुळे कोणी बोलत नाही. बृजभूषण शरण सिंह आणि बागेश्वर बाबा यांनीही बोललो तर जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. अयोध्येचा अंडरवर्ल्ड चालवणारा ‘दाऊद’ कोण आहे, हे मी अयोध्येत जाऊन सांगायला तयार आहे.”

Uddhav Thacekray PC: राममंदिराच्या दानाची चोरी करून पक्ष फोडले; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप,

भाजप हा जगातील सर्वात निर्लज्ज पक्ष

‘एक जण झाड पडून मेला तर दुसरा मॅनहोलमध्ये मेला’ असं म्हणत ते दात काढून हसत आहेत. अशा शब्दांत मुंबई भाजपच्या अध्यक्षांनी सामान्य नागिकांची थट्टा केली. ही किती क्रूरता आणि विकृती आहे. भाजप हा जगातील सर्वात निर्लज्ज पक्ष आहे हे त्यांच्या मुंबई अध्यक्षांनी दाखवून दिलं.” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडी जरी संवेदना शिल्लक असेल, तर त्यांनी अशा व्यक्तीला तात्काळ पदावरून हटवावं.” असे आव्हानही त्यांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, ” नालेसफाई झाली नाही, धोकादायक झाडांबाबतच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झालं, त्यामुळे त्या ११ वर्षांच्या मुलाचा जीव गेला. त्याच्या आई-वडिलांचा आक्रोश सुरू असताना तुम्ही हसत आहात. ही लाजिरवाणी बाब आहे. तुम्ही १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करता. पण प्रत्यक्षात मुंबई तुंबली आहे. माणसं आणि गाड्या पाण्यात वाहून जात आहेत. शंभर टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे उरलेले चार टक्के कोणाचे कमिशन आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या लोकांनी मुंबई महानगरपालिका तर लुटलीच, पण तिकडे राम मंदिर लुटायलाही मागे-पुढे पाहिलं नाही, अशी सणसणीत टिकाही त्यांनी केली.

‘मानसशास्त्रीय’ पद्धतीने केतनच्या खुनाचा उलगडा, पासपोर्ट अन् हुडीने दाखवली दिशा; पोलिसी खाक्याचा वापर नाही

“११ वर्षांचा निष्पाप विहान श्रीवास्तव मृत्यूमुखी पडला. त्याच्या अंत्यसंस्कारावेळी त्याचा क्रिकेटचा चेंडू त्याच्यासोबत ठेवण्यात आला. हे अत्यंत वेदनादायी चित्र आहे. हे अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं आणि भ्रष्टाचाराचं फलित आहे. लोकांचा मृत्यू होत असताना हसणं म्हणजे मृतांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे. गेली सहा-सात महिने तुमच्याकडे सत्ता आहे. त्याआधी साडेतीन वर्षे प्रशासनही तुमच्याच नियंत्रणाखाली होतं. मग प्रत्येक गोष्टीला शिवसेनेला जबाबदार कसं धरता? जर प्रत्येक वेळी २५ वर्षांपूर्वीचा इतिहास काढावा लागत असेल, तर तुम्ही मुंबई महापालिका चालवण्यास अयोग्य आहात. गिरीश महाजन नियंत्रण कक्षात बसून तमाशा करत होते. महाराष्ट्रात राम मंदिरापासून मुंबईपर्यंत लुटालूट सुरू आहे.” अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्याबद्दल तडीपार करण्याची कारवाई होत असेल, तर या देशात लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही. फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना तडीपार करायचं, हेच सुरू आहे. आमचे आंबेगाव-जुन्नरचे संपर्कप्रमुख तथा जिल्हाप्रमुख धीरज भोर यांनी मला एक विषय सांगितला. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं होतं. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा, लहान मुलांचाही मृत्यू होत आहे. त्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह सर्व पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होते. मात्र गुन्हे फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या २०० कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आले. हा किती मोठा पक्षपात आहे. हे गुन्हे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दबावातून दाखल करण्यात आले. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही आंदोलनात होते. हा सामाजिक आणि जनसुरक्षेचा विषय होता. भाजप आणि महायुतीतील कार्यकर्तेही आंदोलनात होते, पण कारवाई फक्त शिवसैनिकांवर झाली.” असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

 

Web Title: Sanjay raut ayodhya ram mandir donation scam allegation news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • sanjay raut
  • Shiv Sena UBT

संबंधित बातम्या

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
1

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान
2

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान

‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा
3

‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप
4

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.