Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर आयुष्यभर जगणं हीच शिंदे गटाची लायकी, संजय राऊतांचं मोठं विधान

संजय राऊत म्हणाले की, “हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने 2014 मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर 40-45 जागांचे तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही”.

  • By साधना
Updated On: Mar 18, 2023 | 12:53 PM
sanjay raut

sanjay raut

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा (BJP) 240 जागा लढवेल. शिंदे गटाच्या वाट्याला 48 जागा येतील अशा आशयाचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर संजय राऊत (Sanjay Ruat) यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले की, “हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने 2014 मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर 40-45 जागांचे तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही. राज्याचा भाजपाचा प्रदेशाध्यक्ष सांगतो, तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ उद्या ते यांना पाच जागा सुद्धा देतील. हीच त्यांची लायकी आहे. त्यामुळेच भाजपाने शिवसेना तोडली. त्यांना या महाराष्ट्रात शिवसेनेचा दरारा संपवायचा होता.”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

[read_also content=”फेसबुक आणि यूट्युबवर डोनाल्ड ट्रम्प यांचं पुनरागमन, दोन वर्षांनंतरच्या पहिल्या पोस्टमध्ये म्हणाले… https://www.navarashtra.com/world/former-us-president-donald-trump-back-on-facebook-and-youtube-nrsr-376911.html”]

ते पुढे म्हणाले, “मुळात मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र तरी माहिती आहे का? त्यांना शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न तरी माहिती आहेत का? तर दुर्दैवाने याचं उत्तर नाही असं आहे. मुख्यमंत्र्यांना फक्त सुप्रीम कोर्टाच्या निकालाची काळजी आहे. निवडणूक आयोगाप्रमाणे हा निकाल सुद्धा विकत घेता येईल का? याचा ते विचार करत आहेत. पण आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राला न्याय मिळेल”.

“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या की नाही, हा वादाच विषय आहे. कारण शेतकऱ्यांच्या मोर्चा आजही सुरू आहे. दुर्देवाने एका शेतकऱ्याचा काल मृत्यू झाला. याला सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत. दोन फुसके मंत्री चर्चा करण्यासाठी नेमके होते. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याचं प्रायश्चित तुम्ही केलं पाहिजे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

त्यांनी पुढे सांगितलं की, “या सरकारवर निसर्ग कोपला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, सरकारने कोर्टबाजीत गुंतलं आहे. विरोधकांना त्रास देण्यात सरकार व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळल्या जाणाऱ्या फासाकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे”.

Web Title: Sanjay raut reaction on shinde group position nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2023 | 12:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marathi News
  • sanjay raut
  • sanjay raut news
  • Shinde group

संबंधित बातम्या

FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू; तीन खास डिजिटल फिल्म्स लाँच
1

FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू; तीन खास डिजिटल फिल्म्स लाँच

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
2

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Navi Mumbai : खारघरमध्ये रक्तपेढीची इमारत तयार होऊनही सेवा बंद; स्थानिकांमध्ये नाराजी
3

Navi Mumbai : खारघरमध्ये रक्तपेढीची इमारत तयार होऊनही सेवा बंद; स्थानिकांमध्ये नाराजी

Samnapur News : “दारू दुकान बंद करा, अन्यथा…”; समनापूरच्या रणरागिणींनी प्रशासनाला झुकावले
4

Samnapur News : “दारू दुकान बंद करा, अन्यथा…”; समनापूरच्या रणरागिणींनी प्रशासनाला झुकावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.