
Shahapur News : शहापूरच्या जंगलात आगीचा तांडव; वणव्यामुळे हजारो हेक्टर हिरवाई जळून खाक
कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली! पण माल मोठ्या प्रमाणात आल्याने दरात घसरण
वणवा रोखण्यासाठी वनविभागातर्फे प्रभावीपणे जनजागृतीवर भर रात्रीच्या वेळी वणवा लागल्याने शेकडो हेक्टर च्यावर जागेतील झाडे जळून खाक झाली. जंगलातील आगी रोखण्यासाठी वनविभागाने प्रभावीपणे जनजागृती करुन उपाययोजना हाती घेतल्याचे दिसते पण स्थानिक रहिवाश्यांनीही वणवे लागू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे.
शहापूर प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अभिजित पिंगळे म्हणाले की, “वणव्या संदर्भात राहणाऱ्या गावात जनजागृती करण्याचे काम सुरु असून, वनजामिनिवर वणवा पसरु नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत तर वणवा लागल्याची माहिती मिळताच आमची टीम अत्याधुनिक यंत्रसामुग्री जागेवर पोहचून वणवा विझवण्याचे काम करीत आहे. परंतु काही समाजकंटक आग लावून वणवा लागल्याचे दर्शवित असून त्याना पकडण्यासाठी उपाय योजना सुरु आहे”.
गवत कापणीनंतर डोंगर पेटवून देण्याचे प्रकार वाढताहेत
तालुक्यातील जंगलक्षेत्र पूर्वीपासुन समृद्ध असून, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, औषधी वनस्पतीचे प्रमाणही जास्त आहे. घनदाट असलेल्या तानसा अभयारण्यात वणवा लागल्याने वनसंपदा कमी होत आहे व जंगल परिसरात मालकी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात असल्याने गवत कापणीनंतर डोंगर पेटवून देण्याचे प्रकार वाढत आहेत. गवत जाळल्यानंतर पुढील वर्षी चांगले गवत येते राखेचा भरभराटीसाठी चांगला उपयोग होतो, अशी येथील आदिवासीची समजूत आहे.
वनराई जळाल्याने परिसर झाला भकास
भातसा, अधई-तानसा अभयारण्य, अजनुप, दापुर, मुंबई-आग्रा महामार्गावरील डोंगर वणव्यामुळे बोडके झाले असून बेलवड, जरंडी, तळवडा, पेंढरी साखरोली व दहीगाव येथील परिसरातील वनराई जळुन गेल्याने परिसर भकास झाला आहे विकासाच्या नावाखाली उद्योगासाठी जगल जाळले जात असल्याने परिसरातील जंगल क्षेत्र घटत आहे. वणव्यामुळे येथील वनवैभव धोक्यात आले आहे.
तब्बल 7 वर्षांनंतर पाटण पंचायत समिती मासिक सभा; आरोग्य व शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे
तीन महिन्यांत १५/१६ हेक्टरवर लागला वणवा
गेल्या ३ महिन्यात १५/१६ हेक्टर जमिनीवर वणवा लागला आहे. शहापूर वनविभागाच्या अतर्गत शहापूर, खडर्डी, धसई, विहिगाव, वाशाळा व डोळखांब हे रेंज येत असून गेल्या दोन महिन्यात मुंबई-आग्रा महामार्ग, भातसा, बिरवाडी, डोळखांब याठिकाणी वारंवार वणवे लागत असल्याच्या घटना घडत आहेत.