Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आता…

राजकिय विचार वेगळे असतील पण महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती नाही" असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 12, 2025 | 12:13 PM
देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आता...

देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आता...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे  :”बीड आणि इतर भाग शांत झाला पाहिजे‌. मी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्री फडणविसांशी फोनवरून चर्चा केली. ही परिस्थिती शांत झाली पाहिजे. राजकिय विचार वेगळे असतील पण महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती नाही” असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. दिल्ली साहित्य संमेलनातील भाषणांचा पुस्तक प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिशय अस्वस्थ अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. बीड तसेच परभणी येथील विषय कसा शांत करता येईल याबाबत चर्चा सुरू आहे. जिवाभावाने एकत्र राहणारे माणसं आज एकमेकांशी शत्रूपणाने वागत आहे. अनेक गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. आज माझी इथ येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली. राजकारणात काही मतभेद असतील पण अशी स्थिती राज्यात होऊ द्यायची नाही आणि हे काम कोणा एकट्या दुकट्याच नाही तसेच मुख्यमंत्री एकटे देखील करू शकत नाही. राज्यातील जाणकार जेव्हा या विषयाला शेवटच्या माणसाला पोहचवतील तेव्हा नक्कीच महाराष्ट्र हा शांत होईल. तसेच महाराष्ट्राला पूर्वस्थितीला आणायचे आहे आणि संकटग्रस्त लोकांना या संकटातून बाहेर आणायचं आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

सरहद पुणे व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य परिषद येथे दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा साहित्यिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. यावेळी झालेल्या भाषणात पवारांनी परभणी आणि बीड येथील घटनेवर चिंता व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे हे देखील उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे म्हणाले की, शरद पवारांनी फुले, शाहु, आंबेडकारांचा विचार पुढे नेण्याचे काम केल आहे. शरद पवारांनी जशी ना. धो. महानोरांना विधानपरिषदेवर संधी दिली तशी पंडीत जवाहरलाल नेहरुंनी कवी दिनकर यांना राज्यसभेवर संधी दिली होती. पंडीत नेहरु अनेक कवी संमेलनांना जात असत. आताच्या पंतप्रधानांबाबत बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही. संमेलनाला कोणी जावे तर ज्याला साहित्य समजते, कविता समजते.तर एकदा पंडीत नेहरुंना कवी संमेलनाला आमंत्रीत करण्यात आलं. स्टेजवर जाताना पंडित नेहरुंचा पाय घसरला तेव्हा कवी दिनकर यांनी त्यांना पकडून ठेवलं आणि पडण्यापासुन वाचवलं तेव्हा पंडीत नेहरु म्हणाले की कवीराज राजकारणात जर माझ्यासकट कुठल्याही राजकारण्याचा पाय घसरला तर आम्हाला असेच सावरा आणि पंडीत नेहरुंनंतर साहित्यिकांना जर असं सांगण्याच धाडस जर कोणात असेल तर ते शरद पवारांमधे आहे. अस म्हणत कसबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

Web Title: Sharad pawar has discussed with devendra fadnavis over phone nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Nashik News : तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता
1

Nashik News : तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!
2

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर
3

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
4

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.