
अवघ्या 20 महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला गळती; 2 कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह
या स्मारकाचे लोकार्पण १ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकना शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखा करण्यात आले होते. मीरा-भाईट महानगरपालिकेने या स्मारकासाठी सुम दोन कोटी रुपयांचा खर्च केला होत शहराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आले हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या इतिहासाची आठवण करून देणारे प्रमुख आकर्षण मानले जाते.
दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यटकांची भेट
स्मारकाच्या चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळे, तोफा, ताफा तसेच विविध ऐतिहासिक प्रसंग दर्शविणाऱ्या आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले असून, दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यटक येथे भेट देत असतात.
Chiplun Flood News : अचानक वाढलेल्या वशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग
स्मारकाच्या चौथऱ्यातून गळती
मात्र, यंदाच्या पावसाळ्यात स्मारकाच्या चौथऱ्यातून गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या गळतीमुळे चौथऱ्यावर उभारण्यात आलेल्या मावळ्यांच्या शिल्पांवर तसेच तोफांच्या प्रतिकृतींवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी रंग उडाला असून, प्लास्टर खराब झाल्याचेही दिसून येत आहे. परिणामी, स्मारकाचे सौंदर्य कमी झाले असून त्याच्या दीर्घकालीन टिकाऊपणाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. अवघ्या २० महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च – झालेल्या स्मारकाची अशी अवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले का, बांधकामादरम्यान आवश्यक जलरोधक – (वॉटरप्रूफिंग) उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच – महापालिकेच्या संबंधित विभागाने कामाची योग्य तपासणी केली होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)