
होळीच्या गाठी बनविणाऱ्या मजुरांचा तुटवडा! यवतमाळात अनेक कारखाने बंद, दर कडाडण्याची शक्यता
दरवर्षी होळीच्या पावर नाक, प्रत्यगत दया दो विश्री केली जाते. ही मागणी लक्षात घेता गाठ्यांची निर्मिती केली जाते. मात्र, यावर्षी गाठ्यांची मागणी असली तरी त्याच्या निर्मितीचे काम रेंगाळले आहे. यातून गाठ्यांची निर्मिती करणाऱ्या कारखानदारांना आखडता हात घ्यावा लागला आहे. यातून बाजारात गाठ्यांचा तुटवडा निर्माण होऊन गाठीचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – istock)
यवतमाळ शहरात २० पेक्षा जास्त गाठीचे कारखाने असतात. यावर्षी केवळ पाच गाठींचे कारखाने तयार झाले आहेत. या ठिकाणी गाठी तयार करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातील कारागीर येतात. यावर्षी हे कारागीरही कमी प्रमाणात आले आहे. गाठी वळण्यासाठी मजूरच मिळत नाही अशी परिस्थिती आहे. याला अनेक बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. विद्यार्थ्यांची दहावी, बारावीची परीक्षा आणि रमजान महिना सुरू असल्याने काम करण्यासाठी कारागीरच उपलब्ध होत नाही. जे कारागीर उपलब्ध आहेत त्यांना आणण्यासाठी कारखाना मालकाला स्वतः प्रवासाचा खर्च द्यावा लागत आहे. यातून गाठ्या बनविण्याचे काम अधिकच महाग झाले आहे. पूर्वी गाठ वळण्यासाठी पाच रुपये किलो मजुरी दिली जात होती. आता ही मजुरी ११ रुपयांवर पोहोचली आहे. यानंतर कामासाठी कामगार मिळणे अवघड झाले आहे. काम करण्यासाठी महिलांची कमतरता असल्याने ऑर्डरनुसार काम करणे अवघड झाले आहे.
विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट
यवतमाळ जिल्ह्यातील माल जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही जात होता. यावर्षी हिंगोली, जालना, वाशिम, रिसोड, अदिलाबाद येथून मागणी आहे. मात्र, त्यांना हव्या असलेल्या गाठ्यांची निर्मितीच नाही. यामुळे ही ऑर्डर रद्द करण्याची नामुष्की व्यावसायिकांवर ओढावली आहे.गतवर्षी ३८०० रुपये क्विंटल साखरेचे दर होते. यावर्षी हे दर ४२०० रुपयांवर पोहोचले आहे. इंधनाचे लाकडाच्या गट्टचे दर चार रुपये होते. हे दर आता आठ रुपये किलो झाले आहेत. यामुळे साखरेची गाठी १२० रुपयांवरून १४० ते १८० रुपये किलोंच्या घरात जाण्याचा अंदाज आहे