
200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता
मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 200 हून अधिक सफाई कर्मचारी कार्यरत होते. त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी 10 पर्यवेक्षक आणि 2 व्यवस्थापक तैनात करण्यात आले होते. संपूर्ण परिसराची विविध विभागांमध्ये विभागणी करून प्रत्येक विभागाची जबाबदारी स्वतंत्र पर्यवेक्षकांकडे सोपविण्यात आली.
एसटीला एकूण 10324 कोटींचा तोटा; तोट्यातील मार्ग ते ई-बसपर्यंतच्या पैलूवर 2 दिवस विचारमंथन
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या मोहिमेदरम्यान जवळपास 50 टन कचरा हटविण्यात आला. पहिल्या दिवशी सुमारे 30 टन, तर दुसऱ्या दिवशी वृत्त देईपर्यंत 15 ते 16 टन कचरा संकलित करण्यात आला होता.
कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन टन क्षमतेची टिपर वाहने, ई-रिक्षा आणि कचरा संकलनासाठी आवश्यक यंत्रांचा वापर करण्यात आला. गवत वाढलेल्या भागांमध्ये मशीनद्वारे गवत कापण्यात आले. याशिवाय परिसरात प्रत्येकी 120 लिटर क्षमतेच्या कचरापेट्याही ठेवण्यात आल्या.
मोहिमेत समुद्रकिनाऱ्याची सखोल स्वच्छता करण्यासह प्लास्टिकजन्य पदार्थ आणि अन्य कचरा हटविणे, अंतर्गत गल्ल्यांची साफसफाई, वारंवार कचरा साचणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता तसेच संकलित कचऱ्याची तातडीने वाहतूक करण्यावर भर देण्यात आला.
परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती सचिन अहिर यांनी वरळी समुद्रकिनारा आणि कोळीवाडा परिसराला भेट दिली. त्यांनी स्वच्छता मोहिमेची माहिती घेतली आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष सुमित साळुंके यांनीही मोहिमेची पाहणी केली. स्वच्छ, निरोगी आणि जबाबदार समाजाच्या निर्मितीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ महाराष्ट्र आणि स्वच्छ भारत अभियानाला योगदान देण्यासह सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्थानिक समुदायाच्या हितासाठी मोहीम राबविल्याचे साळुंके यांनी नमूद केले.
यापूर्वी जुहू समुद्रकिनाऱ्यावर राबविण्यात आलेल्या CSR स्वच्छता उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून वरळीतील ही मोहीम राबविण्यात आली. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी अशा उपक्रमांच्या माध्यमातून योगदान देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.