Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : कृत्रिम तलावांचा अपव्यय; पालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव फक्त कागदावरच

महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना फसली असल्याचं दिसून येत आहे. शहरात लाखो रुपयांत कृत्रिम विसर्जन तलाव उभारले गेले; मात्र भाविकांनी त्याकडे पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 29, 2025 | 02:11 PM
Thane News : कृत्रिम तलावांचा अपव्यय; पालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव फक्त कागदावरच
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना फसली असल्याचं दिसून येत आहे. शहरात लाखो रुपयांत कृत्रिम विसर्जन तलाव उभारले गेले; मात्र भाविकांनी त्याकडे पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे. कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य देत पर्यावरण संरक्षणासाठी एक पाऊल पुढे या असं म्हणत पालिकेने आवाहन देखील केले होते. कृत्रिम तलावांचं सर्व नियोजन देखील करण्यात आलं होतं. मात्र असं असून देखील अनेकांनी थेट गणेश मूर्तीचं खाडीतच विसर्जन केले. परिणामी कोट्यवधींच्या निधीचा अपव्यय झाला आणि खाड्यांचे प्रदूषण वाढले. त्यामुळे महापालिकेच्या मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

ठाणे महापालिकेच्या वरवरच्या पर्यावरण उपक्रमांमुळे केवळ फोटोसेशन होत असले, तरी देखील POP सारख्या घातक मूर्ती पाण्यात मिसळून जैवविविधता उद्ध्वस्त करत आहेत. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका स्थानिक कोळी समाजाला बसत आहे. एकेकाळी मासेमारीतून उदर्निवाह करणारे कोळी आता पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या जिवनावर या विसर्जनामुळे गंडांतर येत असल्याची खंत देखील या समाजाने व्यक्त केली आहे.

Thane News : नागरिकांच्या समस्येवर प्रशासनाने दखल घ्यायलाच हवी; घोडबंदरमध्ये शरद पवार गटाचे आंदोलन

याबाबत पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत रविंद्र सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट स्मरणपत्र पाठवले आहे. यात त्यांनी कृत्रिम तलाव उपक्रमाचे अपयश अधोरेखित करताना म्हटले आहे की “सार्वजनिक निधीचा अपव्यय थांबवून प्रत्यक्षात परिणामकारक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. फक्त पत्रकं, जाहिराती आणि ढोलताशा यावर पैसे उधळून जनतेची दिशाभूल करणं बंद झालं पाहिजे. खाड्यांत विसर्जन रोखण्यासाठी कठोर कायदे, जनजागृती आणि व्यवहार्य उपाय हवेत. अन्यथा पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही केवळ कागदी घोषणा राहील.”

Thane News : जिल्ह्यात गणेशोत्सव दिमाखात साजरा; दीड लाखांपेक्षा अधिक मूर्तींची प्राणप्रतिष्ठा

आज डॉ. प्रशांत रविंद्र सिनकर यांनी त्यांच्या स्मरणपत्रात स्पष्ट मागणी केली आहे की :

१) कृत्रिम विसर्जन तलाव उपक्रमाच्या अपयशाचा तातडीने आढावा घ्यावा.

२) POP आणि रासायनिक रंगांच्या मूर्तींचं विसर्जन खाड्यांत थांबविण्यासाठी कठोर कारवाई करावी.

३) खरोखर व्यवहार्य आणि परिणामकारक पर्यावरणपूरक विसर्जन पद्धती अंमलात आणाव्यात.

“भाविकांच्या श्रद्धेला धक्का न लावता, पर्यावरण आणि खाडी वाचवण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे. अन्यथा ठाणेकरांचा विश्वास उडेल आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही घोषणा लोकांच्या थट्टेचा विषय बनेल, असं पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत रविंद्र सिनकर यांनी सांगितलं आहे.

Web Title: Thane news waste of artificial lakes municipalitys eco friendly ganeshotsav only on paper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही; पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमधील काम पूर्ण
1

Thane News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही; पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमधील काम पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.