Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली! पण माल मोठ्या प्रमाणात आल्याने दरात घसरण

बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन सुमारे 80 टक्क्यांनी घटले आहे. परिणामी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बाजारात हापूसची आवक अत्यल्प होती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 18, 2026 | 10:40 AM
कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली! पण माल मोठ्या प्रमाणात आल्याने दरात घसरण

कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली! पण माल मोठ्या प्रमाणात आल्याने दरात घसरण

Follow Us
Follow Us:

कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे आंबा खवय्यांना आता हापूसचा आस्वाद घेणे सुलभ होणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या अक्षय तृतीये साठी बाजारात आंब्याची आवक वाढली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai: ड्रग्ज’ मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली! मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक; ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा इशारा

यंदा मात्र बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन सुमारे 80 टक्क्यांनी घटले आहे. परिणामी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बाजारात हापूसची आवक अत्यल्प होती. त्यामुळे दर चढे राहिल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आंबा परवडत नव्हता.एप्रिल-मे हा हापूसचा मुख्य हंगाम मानला जातो. या कालावधीत उत्पादन आणि आवक वाढल्याने दर नियंत्रणात येतात. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपर्यंतही आवक कमीच होती.

बाजारात दररोज केवळ ८ ते १० हजार पेट्यांची आवक होत होती. १० एप्रिलनंतर आवक वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आता आवकेत हळूहळू वाढ होत आहे.गुरुवारी वाशी बाजारात हापूस आंब्याच्या सुमारे ८० हजार पेट्यांची आवक झाली, जी यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सवांधिक आवक ठरली आहे.त्या मध्ये कोकणातील ५० हजार पेट्या तर इतर राज्यातील हापूस च्या 30 हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत.त्यामुळे व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत आवक आणखी वाढेल, असा विश्वास फळ बाजार व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात उष्माघात रुग्णांची संख्या १५ वर! अकोला, वाशिम येथे दोन जणांचा बळी; निम्म्या राज्याचे तापमान ४० अंशांवर

दरम्यान, आवक वाढल्याने घाऊक बाजारातील दरातही घट झाली आहे. यापूर्वी दोन ते पाच डझन कच्च्या आंब्याच्या पेट्यांचे दर २००० ते ५००० रुपयांदरम्यान होते. सध्या हे दर १५०० ते ४५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पिकलेल्या आंब्यांचे दर यापेक्षा अधिक आहेत. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदाची एकूण आवक कमीच असली तरी सध्या वाढलेली आवक आणि घसरलेले दर यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे. आगामी काळात आवक वाढत गेल्यास दर आणखी नियंत्रणात येतील, असा विश्वास व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The arrival of hapus mangoes in konkan has increased but due to the arrival of goods in large quantities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • kokan
  • maharashtra

संबंधित बातम्या

नितीन गडकरींची ‘३१ मे’ची डेडलाईन फेल! मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपूर्ण; कोकणवासियांचा प्रवास पुन्हा खडतर
1

नितीन गडकरींची ‘३१ मे’ची डेडलाईन फेल! मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपूर्ण; कोकणवासियांचा प्रवास पुन्हा खडतर

वारीच्या तयारीला वेग द्या, स्वच्छतेत तडजोड नको! विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रशासनाला आदेश
2

वारीच्या तयारीला वेग द्या, स्वच्छतेत तडजोड नको! विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रशासनाला आदेश

Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला वेग! वर्ध्यात ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
3

Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला वेग! वर्ध्यात ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद
4

एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.