
मुंबईकरांचे पाणी आता अधिक शुद्ध होणार! जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढणार
मुंबई शहर आणि उपनगराला पाणी पुरवठाकरण्यासाठी पिसे पांजरापूर येथील संकुलात असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने या संकुलात प्रतिदिन ९१० दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. याकरीता कंत्राटदार नेमण्यात आले असून, प्रकल्प सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
मुंबई शहर आणि उपनगर भागस स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी भातसा नदीच्या पाण्यावर पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प तीन टप्प्यांत बांधण्यात आला आहे.
नवीन केंद्र बांधण्यास आणखी काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे मुंबईकरांचा पाणीपुरवठा बाधित होऊ नये म्हणून पालिकेने याच संकुलात ९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. हा नवीन प्रकल्प उभारल्यानंतर जुन्या प्रकल्पातील सर्वात जुना पहिला टप्पा बंद करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्यातील जलशुद्धीकरण केंद्र १९७९ मध्ये म्हणजेच ४६ वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. वर्षानुवर्षे क्लोरीनसारख्या रसायनांच्या सतत संपर्कात आल्यामुळे याच्या संरचनेची झीज झाली आहे. त्यामुळे या जलप्रक्रिया केंद्रावे आयुर्मान संपुष्टात आले आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाची पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पाणीपुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या जलशुद्धीकरण प्रकल्पाची पुनर्बाधणी केली जाणार आहे.
वाळवण महोत्सव : पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये या तारखेपासून रंगणार उन्हाळी फराळाची मेजवानी
पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पाची सव्याची एकूण क्षमता प्रतिदिन १३६५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची आहे. २१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारल्यानंतर ही क्षमता १८२० दशलक्ष लिटरने वाढेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यानी व्यक्त केला. या कामासाठी नोव्हेंबर २०२५ मध्ये कंत्राटदार नेमण्यात आले असून आता या सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी कामाच्या प्रकल्प व्यवस्थापनासाठी १६८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.