
dam
यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट कायम असून, पावसाळ्याचे २ महिने आणि १३ दिवस उलटल्यानंतरही अनेक प्रकल्प अपेक्षित पातळीपर्यंत भरलेले नाहीत. जिल्हातील काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असला तरी सर्वच भागात एकसमान पर्जन्य झालेला नाही. लघु पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकल्पातील जलसाठा २५.५६ टक्क्यांवरून थेट ३६.४१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातील जलसाठाही १७.४३ टक्क्यांवरून १९.२१ टक्क्यांपर्यंत वाढला. मानोरा आणि कारंजा तालुक्यांमध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मानोरा तालुक्यात केवळ १३.११ मिलिमीटर, तर कारंजा तालुक्यात ४.१३ मिलिमीटर पावसाची नोंद इाली. त्यामुळे या भागातील प्रकल्पांमध्ये अद्याप अपेक्षित जलवाढ झालेली नाही. वाशिम जिल्ह्यातील पावसाचा परिणाम केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहत नाही. वाशिममधून वाहणारे पाणी अकोला जिल्ह्यातील महान आणि पिंजर धरणांकडे जात असल्याने अकोला जिल्ह्यातील नागरिकांचेही वाशिममधील पावसाकडे विशेष लक्ष लागलेले असते. आता उर्वरित पावसाळयात निसर्ग कितपत साथ देतो आणि प्रकल्पांतील जलस्राठ्यात किती चढ होते, याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अद्यापही शून्य टक्के जलसाठा असल्यांचे वास्तव समोर आले आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये ३५ ते ४५ टक्क्यांदरमयान जलसाठा आहे. अनेक प्रकरत्यांना अद्याप शून्याचा टप्पा ओलांडता आलेला नसल्याने भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता नाकारता यंत नाही, सध्या झालेला पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरत असला तरी चरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील जलस्थितीत मोठा बदल होऊ शकतो.