Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणकारी मंडळाला अखेर मुहूर्त; सांगलीतील रिक्षा-टॅक्सी चालकांना होणार लाभ

राज्यात धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची अखेर स्थापना झाली आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास गेली आहेे. सांगली जिल्ह्यातील ८ हजार रिक्षा चालक व २८०० टॅक्सी चालक यांना याचा लाभ हाेणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 15, 2024 | 03:28 PM
कल्याणकारी मंडळाला अखेर मुहूर्त; सांगलीतील रिक्षा-टॅक्सी चालकांना होणार लाभ
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : राज्यात धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची अखेर स्थापना झाली आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास गेली आहेे. सांगली जिल्ह्यातील ८ हजार रिक्षा चालक व २८०० टॅक्सी चालक यांना याचा लाभ हाेणार आहे.

रिक्षा व टॅक्सी चालकांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची अनेक वर्षांपासून मागणी सुरू होती. त्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू होती. अखेर शासनाने १६ मार्च २०२४ रोजी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब’ नावाने मंडळ स्थापन करण्यात आले आहे. कल्याणकारी मंडळाचा सभासद होण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांकडे परवाना व बॅज असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आरटीओ कार्यालयाकडे ८ हजार १९२ रिक्षांची नोंद आहे. तसेच टॅक्सींची संख्या २८१० आहे. त्यामुळे जवळपास दहा हजारहून अधिक जणांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळू शकतो. कल्याणकारी मंडळाकडे वार्षिक वर्गणी, शासकीय अनुदान, नोंदणी शुल्क आणि इतर मार्गाने निधी संकलित होईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यालयात अर्ज करावा लागेल.

कुटुंबातील चार सदस्यांना लाभ

ऑटो रिक्षा परवाना धारक, टॅक्सी चालक यांची नोंदणी आरटीओ कार्यालयामार्फत केली जाईल. नोंदणी केलेल्यांना ओळखपत्र दिले जाईल. मंडळाचा सभासद होण्यासाठी ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी परवाना, बॅज असणे बंधनकारक राहील. पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील चार सदस्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी सभासद नोंदणी आणि ओळखपत्र शुल्क पाचशे रूपये असेल. त्यानंतर वार्षिक सभासद शुल्क तीनशे रूपये राहणार आहे.

या योजनांचा मिळणार लाभ

जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजारांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, ६५ वर्षांवरील परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान आदी योजनांचा लाभ मिळू शकेल.

जिल्ह्यात समितीचे कार्यालय

कल्याणकारी मंडळाची जिल्हा व राज्यस्तरीय समिती असेल. समित्यांची रचना शासन निर्णयानुसार असेल. मुख्य कार्यालय मुंबईत असेल. जिल्ह्यात देखील समितीचे कार्यालय कार्यरत राहील.

Web Title: The welfare board will benefit the rickshaw taxi drivers in sangli nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 03:28 PM

Topics:  

  • maharashtra
  • Riksha

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.