पुणे: बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे (Suresh Dubey Murder Case) यांच्या खून प्रकरणात भाई ठाकूर, गजानन पाटील, दीपक ठाकूर, यांची पुणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. देशातील शेवटच्या टाडा खटल्याचा (Tada Act) निकाल पुणे न्यायालयाने (Pune Court) जाहीर केला आहे. विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा निकाल दिला आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकावर सुरेश दुबे यांचा 34 वर्षापूर्वी खून करण्यात आला होता. विशेष सरकारी वकील सतीश मिश्रा हे या प्रकरणाचं कामकाज पाहत होते.
[read_also content=”एम डी ड्रग्ज आणि चरसचा तिने मांडला होता बाजार, कल्याणच्या ‘या’ इराणी ड्रग लेडीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://www.navarashtra.com/maharashtra/kalyan-khadakpada-police-arrested-irani-drug-lady-from-ambivali-nrsr-403630.html”]
तिघांची निर्दोष मुक्तता
या प्रकरणात आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सहा जणांना जन्मठेप सुनावली आहे. तब्बल 34 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्या प्रकरणाचा आज अखेर टाडाचा शेवटचा निकाल लागला आणि तिघांची निर्दोष मुक्तता केली जाणार आहे. भाई ठाकूर यांच्यासह इतरांवर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यांनी सुरेश दुबे यांना धमकावल्याचा आणि त्यांच्यावर दबाव टाकल्याचा देखील आरोप आहे. सुरेश दुबे यांनी जागेचा ताबा सोडावा आणि हफ्ता द्यावा. अन्यथा त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारु, अशी धमकी तेव्हा देण्यात आली होती. त्यानंतर जागा रिकामी करुन देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे सुरेश दुबे यांनी वकिलांतर्फे ठाकूर यांना नोटीसही पाठवली होती. त्यानंतर 9 ऑक्टोबर 1989 रोजी बिल्डर दुबे रेल्वे स्थानकावर पेपर वाचत असतानाच त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
102 साक्षीदार आणि पाच जणांवर टाडा
हे देशातील शेवटचं टाडा प्रकरण होतं. या खटल्यात एकूण 102 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात भाई ठाकूर यांच्यासोबतच पाच जणांवर टाडा खटला चालवण्यात आला. यातील आरोपींना 1992 मध्ये टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. सन 2005 मध्ये या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरु झाली होती.
सुरेश दुबे हत्या प्रकरण
सुरेश दुबेंसाठी 9 ऑक्टोबर 1989 हा काळा दिवस ठरला. सुरेश दुबे रेल्वे स्थानकावर पेपर वाचत होते. त्याच वेळी त्यांचा पाठलाग करत असलेल्या सहा ते सात आरोपींनी त्यांना हेरलं आणि गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आरोपींवर टाडा लावण्यात आला होता. टाडा कायदा (Terrorist and Disruptive Activities (Prevention) Act) 1985 ते 1995 दरम्यान लागू होता. पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे सुरक्षा दलांना विशेष विशेषाधिकार देण्यासाठी हा कायदा आणण्यात आला होता. याच कायद्याचा शेवटच्या खटल्याचा निकाल आज लागला आहे.