Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत टोल नाका सुरू करा, प्रताप सरनाईकांचे आदेश

दहिसर टोलनाक्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे ॲम्बुलन्स, स्कूलबस आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो. याचपार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांच्याकडून महत्त्वाचे आदेश देण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 11, 2025 | 06:50 PM
AI तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत टोल नाका सुरू करा, प्रताप सरनाईकांचे आदेश

AI तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत टोल नाका सुरू करा, प्रताप सरनाईकांचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:
  • दहिसर टोलनाक्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी
  • ॲम्बुलन्स, स्कूलबस आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा
  • AI-आधारित टोल प्रणालीचा नवा युगप्रवेश

मुंबई : मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपविण्यासाठी दहिसर टोलनाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले . मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “दहिसर टोलनाक्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे ॲम्बुलन्स, स्कूलबस आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो. यामुळे प्रदूषणात भर पडते आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जातो.” हा टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु स्थानिक नागरिकांनी टोल नाक्याच्या स्थलांतरनाला विरोध केला आहे. त्याची बाजू देखील रास्त असून त्यांच्या भुमिकेचा विचार करून टोल नाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन टोल भरणा प्रक्रिया चालू करण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्याचा टोल नाका कायमस्वरूपी बंद करणे शक्य होईल.

शिक्षकांची रवानगी निवडणूक कामासाठी, पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या कचाट्यात शिक्षकांची कुचंबणा!

“AI-आधारित टोल प्रणालीचा नवा युगप्रवेश!”

मंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की, “टोल वसुली अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी. वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन करणाऱ्या AI कॅमेऱ्यांद्वारे स्वयंचलित टोल भरणा होईल, ज्यामुळे टोल नाक्यांवरील लांबच लांब रांगा भूतकाळात जातील.” तसेच, दोन टोलनाक्यांचा भरणा एकाच ठिकाणी करण्याची संकल्पना अमलात आणल्यास वाहतूक आणखी सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.

“रस्ते विकास व कायमस्वरूपी समाधानाची दिशा”

या बैठकीत पेणकर फाटा, सिग्नल येथील वाहतूक सुलभता आणि दिल्ली दरबार हॉटेल ते दहिसर टोल नाका या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

KDMC News : कल्याणकर पाणी जपून वापरा ! पुढचे 12 तास शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

वेळेत बचत

राज्यात सध्या सरकारी मालकीची 20 आणि “एमएसआरडीसी’च्या अखत्यारीतील 16 अशी 36 टोल नाकी आहेत. “फास्ट टोल टॅग’ यंत्रणेमुळे वाहनचालकांच्या वेळेची बचत होईल. टोल नाक्‍यातून वाहन बाहेर पडण्यासाठी सध्या लागणारा 15 ते 20 मिनिटांचा कालावधी अवघ्या तीन ते चार मिनिटांवर येईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Transport minister pratap sarnaik says launch updated toll plazas based on ai technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Cabinet Meeting: 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय
1

Cabinet Meeting: 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय

खो खो स्पर्धेसाठी उत्साह वाढला! पुरुष – महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी पार पडली
2

खो खो स्पर्धेसाठी उत्साह वाढला! पुरुष – महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी पार पडली

Devendra Fadnavis : भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

Devendra Fadnavis : भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Agriculture Loan : “शेतकऱ्यांना कर्ज बेबाकीतून वगळा, सातबारा आहे म्हणून शेतकरी म्हणायचे का?”
4

Agriculture Loan : “शेतकऱ्यांना कर्ज बेबाकीतून वगळा, सातबारा आहे म्हणून शेतकरी म्हणायचे का?”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.