Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहमदनगर शहराच्या पाण्यात वीस टक्के कपात

मुळा धरणावर अहमदनगर शहर, अहमदनगर एमआयडीसी, सुपा एमआयडीसी, नगरमधील लष्करी तळ या मोठ्या योजनांसह विविध गावच्या पाणी योजना आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 02, 2024 | 12:45 PM
अहमदनगर शहराच्या पाण्यात वीस टक्के कपात
Follow Us
Follow Us:

अहमदनगर शहरासह मुळा धरणावरील पाणीपुरवठा योजनेचे 20 % पाणी कपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाण्याबाबतही हाच निर्णय घेतला आहे. वाढते ऊन, त्यामुळे वाढलेले बाष्पीभवन, जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने कमी झालेला साठा या सर्व बाजू लक्षात घेऊन जुलैपर्यंत पाणी उपलब्ध रहावे म्हणून हे कपात धोरण आखले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. अगोदरच मागील पाऊस काळ समाधानकारक झालेला नव्हता. त्यामुळे अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यात पाणी वाटप धोरणाचा फटका नगरमधील धरणांना बसला. त्यातील पाणी जायकवाडी धरणासाठी सोडावे लागले. परिणामी धरणातील पाणी साठा आणखी रोडावला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानात वाढ होत असल्याने बाष्पीभवनचे प्रमाणही वाढले आहे.

या बाबी लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने वेळीच खबरदारी घेतली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैपर्यंत मान्सून पोचतो. त्यानंतर धरणात पाण्याची आवक सुरू होते. तो पर्यंत पाणी पुरले पाहिजे. मुळा धरणावर अहमदनगर शहर, अहमदनगर एमआयडीसी, सुपा एमआयडीसी, नगरमधील लष्करी तळ या मोठ्या योजनांसह विविध गावच्या पाणी योजना आहेत. धरणातील पाणीसाठा 47 टक्क्यांवर आला आहे. साठा खालावल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे आता जवळपास अशक्य आहे. मिळाले तरी त्याचे आवर्तन कमी असेल. बिगर सिंचनासाठीचे पाणी राखून ठेवावे लागणार आहे. त्यात पाणी योजनांना प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे सर्व पाणी योजनांचे वीस टक्के पाणी कपात करण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने ठेवले आहे. तशा सूचना महापालिका, संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत यांना देण्यात आल्या आहेत. एकीकडे उष्णता वाढत असताना दुसरीकडे पाणी पुरवठ्यात कपात होत आहे. नगरकरांना आता पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

Web Title: Twenty percent reduction in ahmednagar city water maharashtra government khandesh government of india ahmednagar news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Government of India
  • Khandesh
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
1

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
3

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
4

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.