Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray : संरक्षण पुरवणाऱ्यांचा औरंगजेब कोण लागतो?, कबरीवरून उद्धव ठाकरे कडाडले

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात सोमवारी रात्री दोन गटात राडा झाला. त्याचे पडसाद आज राज्यभर उमटत आहेत. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून आज सरकारवर कडाडून टीका केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 18, 2025 | 06:07 PM
संरक्षण पुरवणाऱ्यांचा औरंगजेब कोण लागतो?, कबरीवरून उद्धव ठाकरे कडाडले

संरक्षण पुरवणाऱ्यांचा औरंगजेब कोण लागतो?, कबरीवरून उद्धव ठाकरे कडाडले

Follow Us
Close
Follow Us:

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात सोमवारी रात्री दोन गटात राडा झाला. त्याचे पडसाद आज राज्यभर उमटत आहेत. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून आज सरकारवर कडाडून टीका केली आहे. औरंगजेबाजी कबर हटवण्यासाठी कोणाची परवानगी हवी आहे? सरकार ती हटवत का नाही? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कबरीला संरक्षण पुरवणाऱ्या सरकारचा औरंगजेब कोण लागतो? असा संतप्त सवाल केला आहे.

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?

बलाढ्य सत्तेला नमवून स्वराज्याची स्थापना करण्यात आली होती. महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला होता. पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही त्याला जिंकता आला नाही. महाराजांपासून स्फूर्ती घेतलेले संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणींनी त्याला मूठमाती दिली. थोडक्यात सांगायचं झालं तर गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता. असा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही.

त्यामुळे औरंगजेबाची कबर उखडून टाकायची कोणी भाषा करत असेल तर नुसती आंदोलनं करण्यापेक्षा, ते डबल इंजिन सरकार आहे, ते नुसतं वाफा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे. म्हणजे केंद्र सकार संरक्षण देणार असेल, तर केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भाजपला आम्ही विचारतो की, औरंगजेब तुमचा कोण लागतो. आणि दुसरी गोष्ट अशी की औरंगजेब असो अफजल खान असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे हे पुरावे आहेत. ते जर त्यांना हटवावे वाटत असतील तर ती कबर तुम्ही हटवा. आणि तो सोहळा करणार असाल तर नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा, असा टोला त्यांना सरकारला लगावला आहे.

आरएसएसचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे, मग हिंदू खतरे में, कसा काय? मग इतकी वर्ष तुम्हा काय केला? आणि हा प्रकार पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृहखातं झोपा काढत होतं का? हा कट तुमच्या कानावर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? असे अनेक प्रश्न त्यांनी सरकारला विचारले आहेत. या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सरकार त्याचं अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला जर हिरव्या रंगाचा इतका राग असेल तर पहिला तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग हटवून दाखवा. एका बाजूला हिंदूस्तान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तानसोबत दुबईत मॅच खेळायची. ही मॅच यांची पोरंटार जाऊन बघणार. अमित शहांचा मुलगा ही मॅच आयोजित करणार. इकडे गरिबांच्या मुलांना हिंदू मुसलमान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत मॅच बघायची हे हिंदुत्त्व कोणतं, असा सवालही त्यांनी केला आहे.

बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत असताना शेख हसिनांना देशात आश्रय देता. आणि त्याच बांगलादेश सोबत क्रिकेट मॅच खेळायची. म्हणजे सर्वसामान्यांच्या घरांची होळी करायची आणि राजकारण्यांनी पोळी भाजायची, हे घृणास्पद राजकारण आहे. आमच्या राजांच्या पराक्राची प्रतिकं, पुरावे काढायचे आणि कोणाही ऐऱ्या गैऱ्याशी तुलना करायची. कोरटकर मोकाट सुटले आहेत. त्याला का पकडत नाहीत. सोलापूरकर, कोश्यारी होते. त्यांच्यावर कोणती कारवाई नाही. एकीकडे शिवाजी महाराजांचा अवमान करायचा आणि दुसरीकडे औरंगजेबाची विषय काढून आमच्यात दंगली लावून द्यायच्या. त्यामुळे कर्तुत्वहीन माणसाशी शिवाजी महाराजांची तुलना करणाऱ्या एकालाही भर रस्त्यात फटकवलं तर पुन्हा कोणी हिंमत करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Uddhav thackeray attack on cm devendra fadnavis and maharashtra government on aurangzeb tomb remove

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • Aurangzeb
  • Maharashtra Government
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
1

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…
2

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी पूर्ण; लवकरच दिलासा मिळणार…

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका
3

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
4

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.