Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोटरीच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील १२१ गावे आदर्श करणार, केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील

यावेळी या परिषदेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी रोटरीच्या कामाची माहिती दिली. रोटरी ही ११७ वर्षे जुनी संस्था असून जगभरात १२ लाख रोटेरियन काम करतात. तर ठाणे जिल्ह्यात १०९ क्लब असून यामध्ये ४ हजार सदस्य आहेत. आज देखील १५ क्लबने एकत्र येत हा कार्यक्रम राबविला असून ग्रामीण भागात अनेक उपक्रम रोटरीने केले आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे ४५० चेक डॅम बांधले आहेत.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 11, 2022 | 09:15 PM
रोटरीच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील १२१ गावे आदर्श करणार, केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : रोटरी क्लबच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील १२१ गावे आदर्श करणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी दिली. कल्याणमध्ये रोटरी क्लबच्या वतीने ग्रामीण शेती, जमिनीचे संवर्धन, पर्यावरण या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटना प्रसंगी कपिल पाटील बोलत होते. यावेळी रोटरीचे प्रांतपाल कैलाश जेठानी, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, प्रकल्प प्रमुख मनीषा कोंडसकर, संयोजक कैलाश देशपांडे,समन्वयक जितेंद्र नेमाडे, जगदीश म्हात्रे, डॉ. शुश्रुत वैद्य, बिजू उंनिथन, निखिल बुधकर, नितीन मचकर आदीजण उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना जाहीर झाली असून यासंदर्भात बैठका घेऊन या योजनांचा डीपीआर बनवून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार च्या विविध खात्यांमार्फत काम करून ठाणे जिल्ह्यातील १२१ गावं दोन टप्प्यात आदर्श करायची आहेत. मात्र रोटरी सारख्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत झाल्यास एकाच टप्प्यात ही गावे आदर्श करू शकतो. रोटरीने ही १२१ गावे दत्तक घेण्यास सहमती दर्शवली असून त्यामुळे फार मोठं काम केंद्र सरकार आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून या जिल्ह्यात उभं करता येईल. ठाणे जिल्ह्यात एकीकडे टोकाचा विकास झालेली शहरे आहेत तर एकीकडे टोकाचा अविकसित भाग आहे. दोन्ही मधलं अंतर कमी झाल्यास खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचा विकास झाला असे बोलता येईल. त्यासाठी हा प्रयत्न असून येणाऱ्या काळात हे अंतर कमी करून संपूर्ण ठाणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने अग्रेसर आहे असे बोलता येईल असे मत यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केले.

आगामी काळात रोटरी सोबत करार करून काम करण्याचा प्रयत्न असेल. जागतिक स्तरावर भारत कसा असावा या हेतूने काम करायला हवे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचऱ्याचे व्यवस्थापन यामध्ये देखील काम करून जिल्हातील ४५२ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशात ठाणे जिल्ह्याचे नाव होईल.

कार्बन न्यूट्रलची देशाला नाही तर जगाला गरज असून काश्मीर मध्ये हे कार्बन न्यूट्रल गाव आहे. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्याच धर्तीवर ठाणे जिल्हातील १५ गावे कार्बन न्यूट्रल करनार असून यासाठी प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे १५ कोटींचा निधी यासाठी देणार असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.

यावेळी या परिषदेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी रोटरीच्या कामाची माहिती दिली. रोटरी ही ११७ वर्षे जुनी संस्था असून जगभरात १२ लाख रोटेरियन काम करतात. तर ठाणे जिल्ह्यात १०९ क्लब असून यामध्ये ४ हजार सदस्य आहेत. आज देखील १५ क्लबने एकत्र येत हा कार्यक्रम राबविला असून ग्रामीण भागात अनेक उपक्रम रोटरीने केले आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे ४५० चेक डॅम बांधले आहेत. यामुळे या भागातील भूजल पातळी वाढल्याने गावकऱ्यांचे स्थलांतर थांबले आहे. तर मुलींचे शिक्षण सुरू रहावे यासाठी एक हजारहुन अधिक टॉयलेट बांधले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार रोटरीच्या माध्यमातून काम करून ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या परिषदेत मृदा संवर्धन, पशु संवर्धन आणि कचऱ्याचे व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. यात शहरासह ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कचऱ्याचे व्यवस्थापन करत त्याचा खातात रूपांतर कसे करता येईल याबाबत ड्राय वेस्ट या विषयावर निसर्ग फाऊंडेशनचे डॉ. केळशिकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Web Title: Union panchayat raj minister kapil patil will model 121 villages in thane district in collaboration with rotary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2022 | 09:15 PM

Topics:  

  • BJP
  • kapil patil
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
2

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
3

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
4

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.