Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai News : अंत्यविधीसाठी भोगाव्या लागतायत यातना; स्मशानभूमीच्या दयनीय अवस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

ऐन पावसाळ्यात स्मशानभूमीची झालेल्या दुरावस्थेमुळे प्रेतांच्या अंत्यविधीसाठीदेखील कुटुंबियांना अवहेलना सोसावी लागत आहे. नागरिकांचा इतका त्रास सोसावा लागत असून देखील पालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसून आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 08, 2025 | 01:34 PM
Vasai News : अंत्यविधीसाठी भोगाव्या लागतायत यातना; स्मशानभूमीच्या दयनीय अवस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
Follow Us
Close
Follow Us:

वसई /रविंद्र माने : मेल्यानंतर स्वर्ग दिसतो अशी म्हण आहे मात्र त्यासाठी मेल्यानंतरही संघर्ष कायम सुरु आहे. ऐन पावसाळ्यात स्मशानभूमीची झालेल्या दुरावस्थेमुळे प्रेतांच्या अंत्यविधीसाठीदेखील कुटुंबियांना अवहेलना सोसावी लागत आहे. नागरिकांचा इतका त्रास सोसावा लागत असून देखील पालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसून आहे.

उघड्यावर खितपत पडलेल्या स्मशानातील लाकडे पावसात भिजत असल्यामुळे प्रेतावर अंत्यसंस्कार करताना पेल्हार येथील नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत.वसईच्या पूर्वेकडील पेल्हार येथे असलेली हिंदू स्मशानभूमी वनविभागाच्या अखत्यारित येते.

Thane News : आरोग्यम् धनसंपदा! कर्करोगाविषयी जनजागृती मोहीम; जिल्ह्यात ‘इतक्या’ रुग्णांची झाली नोंद

मात्र,वनविभाग आणि वसई-विरार महापालिकेच्या समन्वयाअभावी या स्मशानात मूलभूत सुविधांचा पूर्णत: अभाव असून स्मशानभूमी उघड्यावरच खितपत पडली आहे.परिणामी पावसाळ्यात तसेच अवकाळी पावसात लाकडे भिजून अंत्यविधी पुर्ण करताना नाकीनऊ येत आहेत.त्यामुळे प्रेत जाळायचं तरी कसं ?” असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.वसई-विरार महापालिकेची स्थापना होऊन तब्बल १५ वर्षांचा कालावधी उलटला असतानाही पेल्हारसारख्या मोठ्या लोकवस्ती असलेल्या भागात अद्याप पालिकेने स्वतःची स्मशानभूमी उभारलेली नाही.

Thane News : मिठी नदीतील गाळ अन् नागरिकांच्या जीवाशी खेळ, नागरिकांनी व्यक्त केला संताप

वनविभागाच्या जागेवर असलेल्या या एकमेव स्मशानात तांत्रिक अडचणीमुळे खर्च करता येत नसल्याचे कारण देत शेड,पाण्याची सोय,बसण्यासाठी बाकडे तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या नाहीत.ही बाब मन विषण्ण करणारी आहे.मात्र या दोन्ही प्रशासनाने अत्यावश्यक बाब म्हणून परस्पर सहकार्याने या स्मशानात कायमस्वरूपी सुविधां दिल्या पाहिजेत अशी मागणी केली जात आहे.भिजलेल्या लाकडाच्या सरणावर अंत्यविधी करताना अग्नी पेट घेत नाही. त्यामुळे गाडीचे टायर,डिझेल,तुप,जाडे मीठ यांचा सरणावर सातत्याने मारा करावा लागतो.त्यासाठी भलामोठा भुर्दंड मृताच्या नागरिकांना करावा लागतो.

पेल्हार परिसरात मोठ्या प्रमाणात गोरगरीब नागरिक रहात आहेत.त्यात मजुरवर्गाची मोठी संख्या आहे.हाता-तोंडाची गाठभेट घडवताना त्यांची दमछाक होते.अशावेळी लाकडे भिजलेली असल्यामुळे अंत्यविधी साठी येणारा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.किमान ही बाब पाहून तरी पालिकेने या स्मशानात लाडके ठेवण्यासाठी गोदाम उभारावे अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Vasai news people have to suffer for funerals administration ignores the pitiful condition of the crematorium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • palghar
  • vasai

संबंधित बातम्या

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी
1

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले
2

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले

बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोखाड्यात शैक्षणिक स्पर्धा! आदिवासी संघर्ष समितीचा उपक्रम
3

बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोखाड्यात शैक्षणिक स्पर्धा! आदिवासी संघर्ष समितीचा उपक्रम

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी!
4

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.