मुंबई: भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी हे नातं जोडलं जात आहे, पण ते खरं नाही. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है. अशा शब्दांत पलटवार करत भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. पण काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्यावरून भाजपवर टीका केली होती.
अदानी समुहाला मुंबईतील धारावीची जमीन हवी आहे. त्यासाठी भाजपकडून एक है तो सेफ है चा नारा दिला जात आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. इतकेच नव्हे तर धारावीचा नकाशा, नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे एक पोस्टर दाखवत धारावीसाठी त्यांची एक लाख कोटींची डीलही झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपांना विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
‘रखडलेल्या विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा’
विनोद तावडे म्हणाले, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत 46 हजार कोटी रुपयांचा सोलार प्रोजेक्ट अदानी यांच्याबरोबर करण्यात आला. अशोक गेहलोत यांनी अदानींना जमिनी दिल्या त्यावेळी अदानी कुणाचे होते. काँग्रेसने अदानींसोबत तेलंगाणामध्ये 12400 कोटी रुपयांचा करार केला, तेव्हा हे अदानी कोणाचे होते. युपीए सरकारच्या काळातच अदानी समुहाची विकास झाला. काँग्रेसच्या काळातच अदानी यांचा देशात आणि परदेशात विकास झाला. 2014 सालच्या आधीचे आणि नंतर अदानी समुहाला मिळालेल्या काही प्रकल्पांची यादी आहे.
आज सकाळी राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत एक सेफ काढली. या सेफ मधून त्यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो दखवले. असे फोटो जर काढायचेच होते तर आमच्याकडेही काही फोटो आहेत. असे सांगत तावडें यांनी गौतम अदानी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे फोटो दाखवले तसेच अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना, काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याबरोबर, तैलंगाणातील मुख्यमंत्री यांच्या बरोबर, हरियाणातील 2014 आधी मुख्यमंत्र्यांबरोबरचे असे अनेक फोटो आहेत. काँग्रेस आण गौतम अदानी यांचं नातंं किती जुनं आहे, तेही सांगू शकतो, असा टोलाही तावडेंनी लगावला.
‘… यामुळे काय नुकसान होणार आहे?’ रश्मी शुक्लांविरोधातील याचिकेवर तातडीच्या सुनावणी
दिवंगत राजीव गांधी यांच्या काळतच आपली ग्रोथ झाल्याचं गौतम अदानींनी स्वत:च सांगितलं आहे. काँग्रेसच्या काळातच त्यांचा सर्वात जास्त विकास झाला. पण धारावीत जे लोक राहतात, त्या सर्वांना नवी आणि पक्की घरं मिळणार आहेत. इंडस्ट्रीयल आणि कमर्शिअल गोष्टीही मिळणार आहेत. पण धारावीकरांनी कायम झोपडपट्टीत राहावं असं राहुन गांधी यांची इच्छा आहे. शेख यांना कंत्राट मिळालं नाही, म्हणून एक है तो सेफ है धारावी के लिए शेख है असं म्हणायचं का, अशा शब्दांत विनोद तावडेंनी काँग्रेसला सुनावलं आहे.