Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: शेतकऱ्यांच्या सुरक्षेला आणि हक्कांना प्राधान्य द्या! जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

शेतकरी हिताच्या योजना प्रत्यक्षात वेळेत व पारदर्शकपणे राबवून कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 24, 2025 | 02:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रलंबित व अपील स्वरूपातील प्रकरणांचा सविस्तर आढावा
  • विमा कंपन्यांकडून आतापर्यंत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात मागविण्यात आला
  • कोणताही पात्र शेतकरी शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये
शासनाच्या शेतकरी हिताच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ वेळेत, पारदर्शक पद्धतीने आणि कोणताही अडथळा न आणता पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय अपिलीय समिती व प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रलंबित व अपील स्वरूपातील प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

एक नोट द्या, एक वोट द्या; पुण्यात ‘रासप’च्या इच्छुक उमेदवाराचा अनोखा प्रचार

या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह, कृषी उपसंचालक हिना शेख, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शंकर कोकडवार, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर, एआयसी विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेतील प्रलंबित व अपील प्रकरणांचा तातडीने निपटारा करून शेतकरी कुटुंबांना दिलासा देणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान वेळेत व पारदर्शक पद्धतीने वितरित व्हावे, यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने काम करावे. यासंदर्भात विमा कंपन्यांकडून आतापर्यंत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात मागविण्यात आला आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, पीक नुकसानभरपाई वितरणातील अडचणी, विमा कंपन्यांकडील कारवाईची सद्यस्थिती तसेच दाव्यांच्या निकाली काढण्यास होत असलेला विलंब यावर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त अर्जांवर वेळेत व न्याय्य निर्णय होणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा होण्यास मोठा विलंब होत असल्याने हा कालावधी कमी करण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रकरणाबाबत ‘स्पेसिफिक रीजन’ तसेच केसनिहाय तपशील लेखी स्वरूपात सादर करावा, असेही आदेश देण्यात आले. नेमका स्टॅन्ड स्पष्ट न झाल्यास विहित मुदतीत अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सिन्नरला माणिकराव कोकाटेच ठरले बाजीगर! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सभा ठरल्या निष्प्रभ; भाजपाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे, कोणताही पात्र शेतकरी शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेती व शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचवणे, हा या आढावा बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी अधोरेखित केले. बैठकीतील सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी केले.

Web Title: Washim news give priority to the safety and rights of farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: अनसिंग ग्रामपंचायतीतील गैरप्रकरणी सरपंच व सदस्यत्व अपात्रता कायम; सर्व न्यायिक स्तरांवर निर्णय स्थिर
1

Washim News: अनसिंग ग्रामपंचायतीतील गैरप्रकरणी सरपंच व सदस्यत्व अपात्रता कायम; सर्व न्यायिक स्तरांवर निर्णय स्थिर

Murtizapur News: पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांचे विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन
2

Murtizapur News: पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांचे विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन

Washim News: जिल्हास्तरीय आढावा बैठक पार! जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रशासन कटिबद्ध
3

Washim News: जिल्हास्तरीय आढावा बैठक पार! जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रशासन कटिबद्ध

Washim News : वाशिमचे सीएस पुन्हा राज्यात ‘सर्वोत्कृष्ट’! मूर्तिमंत नेतृत्वाचे ज्वलंत उदाहरण
4

Washim News : वाशिमचे सीएस पुन्हा राज्यात ‘सर्वोत्कृष्ट’! मूर्तिमंत नेतृत्वाचे ज्वलंत उदाहरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.