Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान ! मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार, धरणांमध्ये फक्त 48 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये राखीव पाणीसाठा मिळून 48 दिवस पुरेल इतकाच साठा असल्याची माहिती आहे.

  • By साधना
Updated On: Jun 16, 2023 | 04:38 PM
water tap

water tap

Follow Us
Follow Us:

मुंबई: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. (Mumbai Water Crisis) सातही धरणांमधील राखीव साठा मिळून आता मुंबईला 48 दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. जून महिना ओसरला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीची (Mumbai Water Cut) टांगती तलवार आहे. (Mumbai News)

एकीकडे बिपारजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Crisis) मान्सून पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झालायं. दुसरीकडे, अल निनो देखील सक्रिय झाला आहे. मान्सूनवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसोबत धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटत असल्याने सर्वसामान्य नागरिक देखील चिंतेत आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये राखीव पाणीसाठा मिळून 48 दिवस पुरेल इतकाच साठा असल्याची माहिती आहे.

15 दिवसात पाऊस आला नाही तर…
जून महिना निम्मा ओसरला तरी मान्सून मुंबईत दाखल झालेला नाही. त्यामुळे आणखी 15 दिवस वाट पाहून जून अखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे 15 दिवसांमध्ये पाऊस पडला नाही. तर मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबईतील तलाव आणि त्यामधील पाणी साठा
-अप्पर वैतरणा – शून्य टक्के
-मोडकसागर – 22.17 टक्के
-तानसा – 19.58 टक्के
-मध्य वैतरणा – 13.32 टक्के
-भातसा -5.27 टक्के
-विहार – 21.92 टक्के
-तुळसी – 28 टक्के

याचाच अर्थ 2023 मध्ये एकूण सातही धरणांमध्ये 15.69 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालिकेकडून राज्य सरकारला या धरणांमधील काही साठा राखीव ठेवावा अशी मागणी केल्यानंतर ती मान्य करण्यात आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय जर तो पडला तरच पाणीकपात होणार नाही. मात्र तोपर्यंत तरी मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.

राज्यातील पाणीसाठ्यातही घट
दुसरीकडे राज्यातील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. मान्सून जर लवकर सक्रीय झाला नाही तर एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो.

Web Title: Water crisis for mumbai only 48 days water storage available for city nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2023 | 04:36 PM

Topics:  

  • marathi latest news
  • Marathi News
  • Mumbai
  • mumbai water cut

संबंधित बातम्या

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास
1

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’
2

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती
3

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य
4

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.