Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान ! मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार, धरणांमध्ये फक्त 48 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये राखीव पाणीसाठा मिळून 48 दिवस पुरेल इतकाच साठा असल्याची माहिती आहे.

  • By साधना
Updated On: Jun 16, 2023 | 04:38 PM
water tap

water tap

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. (Mumbai Water Crisis) सातही धरणांमधील राखीव साठा मिळून आता मुंबईला 48 दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. जून महिना ओसरला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीची (Mumbai Water Cut) टांगती तलवार आहे. (Mumbai News)

एकीकडे बिपारजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Crisis) मान्सून पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झालायं. दुसरीकडे, अल निनो देखील सक्रिय झाला आहे. मान्सूनवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसोबत धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटत असल्याने सर्वसामान्य नागरिक देखील चिंतेत आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये राखीव पाणीसाठा मिळून 48 दिवस पुरेल इतकाच साठा असल्याची माहिती आहे.

15 दिवसात पाऊस आला नाही तर…
जून महिना निम्मा ओसरला तरी मान्सून मुंबईत दाखल झालेला नाही. त्यामुळे आणखी 15 दिवस वाट पाहून जून अखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे 15 दिवसांमध्ये पाऊस पडला नाही. तर मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबईतील तलाव आणि त्यामधील पाणी साठा
-अप्पर वैतरणा – शून्य टक्के
-मोडकसागर – 22.17 टक्के
-तानसा – 19.58 टक्के
-मध्य वैतरणा – 13.32 टक्के
-भातसा -5.27 टक्के
-विहार – 21.92 टक्के
-तुळसी – 28 टक्के

याचाच अर्थ 2023 मध्ये एकूण सातही धरणांमध्ये 15.69 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालिकेकडून राज्य सरकारला या धरणांमधील काही साठा राखीव ठेवावा अशी मागणी केल्यानंतर ती मान्य करण्यात आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय जर तो पडला तरच पाणीकपात होणार नाही. मात्र तोपर्यंत तरी मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.

राज्यातील पाणीसाठ्यातही घट
दुसरीकडे राज्यातील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. मान्सून जर लवकर सक्रीय झाला नाही तर एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो.

Web Title: Water crisis for mumbai only 48 days water storage available for city nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2023 | 04:36 PM

Topics:  

  • marathi latest news
  • Marathi News
  • Mumbai

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
2

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
3

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
4

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.