Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : सामान्यांच्या घशाला कोरड अन् मंत्र्यांसाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

उन्हाळ्याच्या तडाख्यात होरपळणाऱ्या सातारकरांवर पाणी कपातीची सक्ती लादणारी सातारा नगरपालिका,तर दुसरीकडे मंत्र्यांच्या स्वागतासाठी लाखो लिटर पाणी वाया घालवले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 20, 2026 | 02:42 PM
Water cut for common people 3 tankers of water at eknath shinde sabha ground Satara News

Water cut for common people 3 tankers of water at eknath shinde sabha ground Satara News

Follow Us
Follow Us:

Satara Water Crisis : सातारा : साताऱ्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई (Water Shortage) जाणवू लागली आहे. मात्र याचा फटका फक्त सामान्य लोकांना बसत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे उन्हाळ्याच्या तडाख्यात होरपळणाऱ्या सातारकरांवर पाणी कपातीची सक्ती लादणारी सातारा नगरपालिका, (Satara News) तर दुसरीकडे मंत्र्यांच्या स्वागतासाठी लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर ओतताना दिसत आहे. या दुटप्पी धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

नगरपालिकेने पाणी बचतीच्या नावाखाली शहरातील २५ प्रभागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे आठवड्याला सुमारे ३६ एमएलडी पाणी बचत करण्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. कपातीच्या दुसऱ्याच दिवशी अनेक भागांत कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने सातारकर त्रस्त झाले आहेत.
अशा परिस्थितीत नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गांधी मैदानावरील स्वागत सभेसाठी मात्र पाण्याची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. धूळ उडू नये म्हणून मैदानावर सुमारे तीन टँकर पाणी मारण्यात आले. म्हणजेच नागरिकांना पाणी वाचवण्याचे आवाहन करणारीच यंत्रणा स्वतःच पाण्याचा अपव्यय करताना दिसत आहे.

हे देखील वाचा : तळेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट; कोयत्याच्या धाकाने लूट, तरुणाचे अपहरण

“सातारकरांसाठी पाणी कपात आणि मंत्र्यांसाठी मोकळा नळ हा कुठला न्याय?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासकीय दौऱ्यांसाठी प्रोटोकॉल असतो, सुविधा दिल्या जातात, हे मान्य असले तरी सामान्य जनतेला त्रास देऊनच या सुविधा पुरवायच्या का, असा रोष व्यक्त होत आहे.

याच मुद्द्यावर सामाजिक संस्थांनीही आवाज उठवला आहे. “पाणी कपातीचे नियम फक्त नागरिकांसाठीच आहेत का? ते मंत्र्यांना लागू होत नाहीत का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते हरी शिवशरण यांनी तर “नगरपालिकेचे नियम व्यक्तीगणिक बदलतात का?” असा थेट आरोप केला आहे.
सातारा नगरपालिका ही शहराची ‘मातृसंस्था’ मानली जाते. मात्र त्या संस्थेनेच आपल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकायला लावायचे आणि दुसरीकडे राजकीय कार्यक्रमांसाठी पाणी उधळायचे, ही बाब संतापजनक असल्याची भावना नागरिकांत आहे.

हे देखील वाचा : अमित कदमांचा कोणता झेंडा घेऊ हाती? भाजप नेत्यांशी वाढली सलगी; ठाकरे गटाच्या जीवाला घोर

पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या सातारकरांना दिलासा देण्याऐवजी अशा प्रकारे दुहेरी निकष लावले जात असतील, तर प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता तरी नगरपालिका या धोरणावर पुनर्विचार करणार का, की “सामान्यांसाठी नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी सूट” हीच भूमिका कायम ठेवणार, याकडे संपूर्ण साताऱ्याचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Water cut for common people 3 tankers of water at eknath shinde sabha ground satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Satara News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…
2

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
3

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय
4

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.