Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवना-मुळशी धरणांमधून पाण्याचा विसर्ग; पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा

आपत्ती परिस्थितीत तातडीने कारवाई करता यावी म्हणून पीसीएमसीची आपत्ती प्रतिसाद यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आवश्यक साधनसामुग्रीसह बचावपथके तैनात करण्यात आली आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत करण्यात आली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2025 | 03:13 PM
खडकवासला धरणातून दिले जाणार शेतीसाठी पाणी; दोन टप्प्यांमध्ये होणार पुरवठा

खडकवासला धरणातून दिले जाणार शेतीसाठी पाणी; दोन टप्प्यांमध्ये होणार पुरवठा

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पवना आणि मुळशी धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) नदीकाठच्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे दोन्ही धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला आहे.

महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, पवना धरण सद्यस्थितीमध्ये ७७.५४ टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून, धरणामध्ये येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने २८०० क्युसेक मुक्त विसर्ग चालू आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत घाटमाथा व पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी आपत्कालीन प्रतिसाद पथकांना पूर्ण सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी नदीकाठच्या भागांमध्ये जाणे टाळावे, तसेच सावधगिरी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपत्ती परिस्थितीत तातडीने कारवाई करता यावी म्हणून पीसीएमसीची आपत्ती प्रतिसाद यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आवश्यक साधनसामुग्रीसह बचावपथके तैनात करण्यात आली आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, वरिष्ठ अधिकारी, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे शेखर सिंग यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने नागरिकांना कोणतीही अफवा न पसरवता, अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांनुसारच वर्तन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खेड तालुक्यात धरण क्षेत्रात संततधार

खेड तालुक्याच्या धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण जलसाठा झपाट्याने वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (ता. ७) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धरणातून एकूण २२०० क्युसेकने विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात आला.

Web Title: Water release from pawana mulshi dams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • pune news

संबंधित बातम्या

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
1

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
2

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
3

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
4

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.