Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ८३.६८% साठा! पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, तरी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अद्याप नाही

धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे सातपैकी चार प्रमुख धरणे ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागली आहेत. यामध्ये विहार आणि तुलसी तलाव सर्वात आधी म्हणजेच ७ जुलै रोजी ओव्हरफ्लो झाले.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2026 | 09:00 AM
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ८३.६८% साठा! पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, तरी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अद्याप नाही

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ८३.६८% साठा! पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, तरी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अद्याप नाही

Follow Us
Follow Us:

मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागाने २५ जुलै रोजी सकाळी ६.०० वाजता जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार, मुंबईला दररोज पाणी पुरवणाऱ्या सातही महत्त्वाच्या तलावांमध्ये मिळून एकूण क्षमतेच्या ८३.६८ टक्के म्हणजेच तब्बल १२ लाख ११ हजार १८८ दशलक्ष लिटर उपयुक्त जलसाठा जमा झाला आहे. तलावांमधील पाणी पातळी समाधानकारकरित्या वाढली असली तरी, प्रशासनाकडून अद्याप पाणीकपातीबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असला तरी, मुंबईकरांना पाणीकपातीबाबतच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.(फोटो सौजन्य – istock)

तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा

गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. या काळात भातसा धरण क्षेत्रात सर्वाधिक १५९ मिमी पावसाची नोंद झाली, तर अप्पर वैतरणा क्षेत्रात १३१ मिमी, मिडल वैतरणात ९३ मिमी, तानसामध्ये ९० मिमी आणि मोडक सागरमध्ये ८४ मिमी पाऊस झाला. भांडुप कॉम्प्लेक्स येथे २४ तासांत १२ मिमी पाऊस झाला असून या मोसमातील एकूण पाऊस २,२१४ मिमीवर पोहोचला आहे.

मागील वर्षी २५ जुलै रोजी तलावामध्ये ८७.२१ टक्के जलसाठा होता, तर २०२४ मध्ये याच दिवशी ६६.७७ टक्के साठा होता. मुंबईला वर्षभरासाठी एकूण सुमारे १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. जुलै महिन्यातच ८३ टक्क्यांहून अधिक साठा जमा झाला असला तरी, महापालिका पाणीकपात रद्द करण्याबाबत काय आणि कधी निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.

Sanjay Raut on Dharmendra Pradhan: आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितलं…

धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे सातपैकी चार प्रमुख धरणे ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागली आहेत. यामध्ये विहार आणि तुलसी तलाव सर्वात आधी म्हणजेच ७ जुलै रोजी ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर तानसा तलाव २२ जुलै रोजी सकाळी ८:५१ वाजता भरून वाहू लागला, तर मोडक सागर धरण २३ जुलै रोजी पहाटे २:०७ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. सध्याच्या स्थितीनुसार मोडक सागर, विहार आणि तुलसी या तिन्ही तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून तानसा तलाव ९८.४५ टक्के भरला आहे. तसेच मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवणाऱ्या भातसा धरणात ८२.६८ टक्के, मिडल वैतरणामध्ये ८०.७३ टक्के आणि अप्पर वैतरणामध्ये ६८.११ टक्के साठा जमा झाला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Water stock in the lakes supplying mumbai reaches 83 68 percent water levels have risen yet no decision has been made to lift water cuts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • lake
  • Mumbai News
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर
1

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत
2

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत

मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर… तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?
3

मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर… तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?

तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा
4

तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.