Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्त्वपूर्ण घोषणा; आश्वासन देत म्हटलं…

विरोधी पक्षात एकी दिसलीच नाही. अंतिम आठवडा प्रस्तावात खोटे प्रश्न होते. चुकीच्या माहितीच्या आधारावर कामकाज करण्याचा प्रयत्न केला. पायऱ्यांवर आंदोलन केले. मारामारीचा प्रकार अक्षम्य होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 19, 2025 | 07:17 AM
अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' महत्त्वपूर्ण घोषणा; आश्वासन देत म्हटलं...

अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' महत्त्वपूर्ण घोषणा; आश्वासन देत म्हटलं...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना अनेक मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात चकमक झाल्याचे पाहिला मिळाले. याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं. ‘शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच’, असे त्यांनी म्हटले.

शेतकरी कर्जमाफी हा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आहे. वेळोवेळी याची चर्चा देखील केली जाते. मात्र, यंदाच्या अधिवेशनातही चर्चा झाली. यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच. पण कर्जमाफी हा तात्कालिक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. शिफारशी त्याच्याच करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. संयुक्त चिकित्सा समितीत त्यांचाही समावेश होता. तेव्हा अंतिम मसुदा त्यांच्याच सहमतीने मंजूर केला गेला. मसुद्यात काहीच आक्षेपार्ह नसल्याने त्यांनी तेव्हा कोणताच विरोध केला नाही. आता मात्र कोणाचा तरी दबाव आल्याने त्यांनी आता वेगळी भूमिका घेतल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आमचे महायुतीत सगळे आलबेल आहे. आम्ही तिघेही सक्षम असून कोणी कितीही काडया टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही स्थिर आहोत, असेही ते म्हणाले.

गंमतीच्या गोष्टी सिरियसली का घेता?

उद्धव ठाकरेंना तुम्ही तुमच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे त्याबाबत विचारले असता, अहो उद्धवजी देखील याबाबत बोलले आहेत की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात. आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात बोललो तरी हेडलाईन होते. मी बोललो तर ती ऑफर झाली का?  अलीकडच्या काळात संवाद होत असेल किंवा गंमतजंमत होते ती का सिरियसली घेता असा उलट सवाल फडणवीस यांनी केला.

विरोधी पक्षात एकी दिसलीच नाही

विरोधी पक्षात एकी दिसलीच नाही. अंतिम आठवडा प्रस्तावात खोटे प्रश्न होते. चुकीच्या माहितीच्या आधारावर कामकाज करण्याचा प्रयत्न केला. पायऱ्यांवर आंदोलन केले. मारामारीचा प्रकार अक्षम्य होता. तो अध्यक्षांनी गांभीर्याने घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title: We will fulfill the promise we made regarding farmer loan waiver says cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 07:17 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • maharashtra news
  • Maharashtra Vidhan Sabha

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
1

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
2

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
3

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
4

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.