
Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही
ग्राहकांना पैसे काढण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून राष्ट्रीयीकृत आणि इतर बँकांनी एटीएम केंद्रे स्थापन केली आहेत. जिल्ह्यात लहान-मोठी गावे आणि शहरे यासह एकूण ३०१ एटीएम कार्यरत आहेत. परंतु, यापैकी बहुतेक एटीएम केंद्रे सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय कार्यरत असल्याने एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत बँका, ६ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ५ खाजगी बँका आणि अनेक सहकारी बँका कार्यरत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात त्यांच्याकडून एटीएम बसवण्यात आले आहेत. सध्या जवळपास सर्वांकडे स्मार्ट मोबाइल असल्याने ऑनलाइन पेमेंट आणि डिजीटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. बहुतेक व्यवहार हे मोबाइलवरूनच केले जाते. त्यामुळे आता एटीएमवर ग्राहकांची गर्दी कमी असल्याने अनेक एटीएम केंद्रे निर्जन अवस्थेत आहेत.(फोटो सौजन्य – istock)
रासायनिक खतटंचाईचे सावट! युद्धजन्य परिस्थितीचा फटका; संतुलित खताचा वापर करण्याचे आवाहन
स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक इत्यादी बँकांचे जिल्ह्यात शेकडो एटीएम कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे, खाजगी बँकांमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, इंड्सइंड, डीसीबी, अॅक्सिस बँक, स्मॉल फायनान्स बँक, आयडीबीआय इत्यादी बँकांमध्ये ५० हून अधिक एटीएम आहेत, सहकारी बँकांचे ९० च्यावर एटीएम आहेत. शहरी आणि ग्रामीण भाग मिळून एकूण संपूर्ण जिल्ह्यात ३०१ एटीएम कार्यरत आहेत.
जिल्ह्यातील अनेक एटीएम केंद्रांचे दरवाजे तुटलेले आहेत. आत जमिनीवर धूळ, कचरा आणि एटीएममधून निघालेल्या स्लिप दिसतात. काही एटीएम केंद्रे भटक्या कुत्र्यांचे, गायीचे आणि इतर प्राण्यांचे निवासस्थान बनले आहेत. तर खाजगी आणि सहकारी बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्था चांगली असल्याचे आढळून आले.
जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या बहुतेश एटीएममध्ये सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही प्रणाली यासह इतर सुविधा आहेत. मात्र अनेक राष्ट्रीयीकृत बँकाचे एटीएम सेंटर हे निर्जनस्थळी आहेत. तसेच यात सुरक्षेकरिता सुरक्षा कर्मचारी नसल्याने एटीएमची सुरक्षा धोक्यात आली आहे. कधी कधी तर या एटीएममध्ये जनावरांनी आपला ठिय्या मांडलेला दिसतो.
कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना
66 संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ३०१ एटीएम कार्यरत आहेत. या सर्व एटीएम केंद्रांमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे कार्यरत आहेत. तथापि, काही एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक नाहीत. याबाबत संबंधित बैंक व्यवस्थापकांकडून माहिती घेऊन येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे निर्देश देण्यात येईल, असे मत ज्ञानेश्वर टापरे, अग्रणी बैंक व्यवस्थापक यांनी व्यक्त केले आहे.