
परदेशात नियम पाळता, मग भारतात का नाही? मुंबईतील सार्वजनिक ठिकाणांवरील घाणीसंदर्भात उच्च न्यायालयाने ओढले ताशेरे
मुंबईतील सार्वजनिक ठिकाणांवरील घाण, प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनाच्या दयनीय स्थितीवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांच्या निष्काळजी वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “भारतात अनेक जण कोणतीही खंत न बाळगता रस्त्यावर कचरा टाकतात; मात्र परदेशात गेल्यावर तेच लोक स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळतात,” अशा शब्दांत न्यायालयाने नागरिकांना फटकारले. स्वच्छ वातावरणाचा अधिकार तेव्हाच अर्थपूर्ण ठरेल, जेव्हा प्रत्येक नागरिक स्वतःची जबाबदारीही पार पाडेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.(फोटो सौजन्य – AI)
एसटीतून प्रवास करताना सवलतीचा लाभ घेताय? तर आता तुमचंही होणार सर्वेक्षण
न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडमुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी, वायू उत्सर्जन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांबाबत दाखल याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ ‘बृहन्मुंबई महापालिके’ची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. स्वच्छ वातावरणाची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे ही आपली मूलभूत सामाजिक जबाबदारी समजली पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले.
खंडपीठाने महापालिका अधिकाऱ्यांना स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. “परदेशात चॉकलेटचा छोटासा रॅपरही लोक कचरापेटीत टाकतात; मात्र भारतात तेच लोक रस्त्यावर कचरा फेकण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हीच का स्वातंत्र्य आणि लोकशाहीची किंमत?” असा सवाल न्यायालयाने केला.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर वाढत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्याबाबतही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. समुद्रकिनारे प्लास्टिकने भरून गेले असून ही स्थिती कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारी नसल्याचे न्यायालयाने म्हटले, रस्ते आणि अरुंद गल्लीबोळांमध्ये साचलेला कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
Ans: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब असल्याचे न्यायालयाने नमूद केले. नागरिकांनी परदेशात जसे नियम पाळतात तसेच भारतातही पाळावेत, असे निरीक्षण न्यायालयाने व्यक्त केले.
Ans: यामुळे अस्वच्छता वाढते, संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होतो, पर्यावरणाचे नुकसान होते आणि नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
Ans: स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाची असली तरी प्रत्येक नागरिकानेही नियमांचे पालन करून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.