पुणे : राज्यात सत्तांतर होऊन आता चार महिने होत आहेत, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नियुक्ती झाली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने कामाचा धडाका सुरु केला आहे. यातच विरोधक आणि सत्ताधारी अनेकवेळा आमनेसामने येत भिडले आहेत. दरम्यान, दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे.
[read_also content=”एक नेता, एक झेंडा, एक मैदान – दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर बघितला का ? https://www.navarashtra.com/maharashtra/second-teaser-of-shivsena-dasara-melava-is-revealed-nrsr-332303.html”]
दरम्यान, आम्ही सुद्धा सरकारमध्ये होतो. पण कुणाला मुद्दाम त्रास दिला नाही. आम्ही कधी सत्तेचा माज केला नाही. सत्तेपायी आम्ही कधी आमच्या विरोधकांनाही त्रास दिला नाही. मला सरकारी सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की, कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना पवार म्हणाले की, एक गोष्ट लक्षात ठेवा की, दिवस बदलत असतात. आम्ही कधी सत्तेत येऊन बसू तुम्हाला कळणारही नाही, असा सूचक इशारा अजित पवार यांनी दिला.