
Pune Airport Construction NOC Applications Surge News :
या बैठकीत NCP (SP)चे खासदार महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघातील समस्या आणि विकासाशी संबंधित मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सध्या केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमात असलेला परिसीमनाचा मुद्दाही या चर्चेत महत्त्वाचा ठरू शकतो. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होत असल्याने या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच परिसीमनाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले आहेत. प्रस्तावित बदलांमध्ये देशातील सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये समान पद्धतीने वाढ करण्यात आली, तरच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परिसीमन प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा विचार केला जाऊ करू शकतो, असे सुप्रिया सुळेनी आधीच स्पष्ट केलं आहे. तसेच,
देशभरातील लोकसभा मतदारसंघांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद विधेयकात करण्यत आली तरच प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा विचार करू, असे सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
केंद्र सरकारकडून महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन विधेयक या दोन्ही मुद्द्यांचा प्राधान्याने समावेश करणार असल्याचे सांगत आहे. परिसीमनाच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर महिला आरक्षणाच्या तरतुदी लागू करण्याच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण या मुद्द्यांवरून संसदेत सरकार आणि विरोधकांमध्ये सातत्याने मतभेद उफाळून येत आहेत. त्यामुळे विविध पक्षांच्या खासदारांशी चर्चा करून सहमती निर्माण करण्याचे प्रयत्न केंद्राकडून सुरू असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेत NDAकडे आवश्यक संख्याबळ असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. सरकारला आतापर्यंत सुमारे 366 खासदारांचा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, संसदेतील विरोधी पक्षांचा विरोध कायम राहिल्यास आणि सध्याच्या पावसाळी अधिवेशनात या विधेयकांवर चर्चा न झाल्यास, केंद्र सरकार महिन्याच्या अखेरीस संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या पर्यायावरही विचार करू शकते, अशीही माहिती आहे.
शरद पवार गटाच्या खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती असून, आज 10 ऑगस्ट रोजी ही भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीत मतदारसंघातील प्रश्नांसोबतच परिसीमन प्रक्रिया आणि महिला आरक्षणासारख्या महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याआधी सुप्रिया सुळे यांनी परिसीमनाबाबत दिलेल्या संकेतांमुळे या संभाव्य भेटीचे राजकीय महत्त्व आणखी वाढले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर NCP (SP)चा परिसीमन विधेयकाबाबत नेमका काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.