
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अक्षय कुमार सध्या ‘भूत बंगला’ या आपल्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत, जो १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट असून यात अक्षय यांची मजेशीर भूमिका पाहायला मिळणार आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारने भुतांवर विश्वास आहे की नाही, याबद्दल खुलासा केला. अभिनेत्याने त्याच्या जुन्या घरातील एक भयानक अनुभव सांगितला. अक्षयच्या घरात तो त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना आणि त्यांचा मुलगा आरव कुमार याच्यासोबत राहत एकत्र राहत होते. आणि त्याना नेहमीच तिथे काहीतरी विचित्र असल्याची जाणीव होत असे.
ट्विंकल खन्ना यांना घरात काहीतरी असल्याची जाणीव
ट्विंकल खन्नाने देखील त्या घरात काहीतरी गडबड असल्याचं वाटायचं. अक्षय कुमारने ‘India Today’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “आम्ही अशा घरात राहत होतो जिथे माझी पत्नी नेहमी म्हणायची की इथे काहीतरी बरोबर नाही. त्या वेळी माझा मुलगा आरव साधारण चार-पाच वर्षांचा होता.” अक्षय कुमार पुढे म्हणाला की, “मी तिला म्हणायचो, ‘टीना, तू शिक्षित आहेस, तू अशा गोष्टी कशा काय बोलू शकतेस?’ पण तरीही ती सतत म्हणायची की तिने घरात एखाद्या महिलेच्या चालण्याचा आवाज ऐकला आहे.”
‘भूत असतात, मला तेव्हा समजले’ – अक्षय
अक्षय कुमारने पुढे सांगितले की ते ट्विंकल खन्नाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. पण एक दिवस त्याच्या पायाखालची जमीन सरकली, जेव्हा मुलगा आरव कुमार अचानक कोणाकडे तरी बोट दाखवत बोलू लागला. त्या प्रसंगाची आठवण करत अक्षय म्हणाला, “एक दिवस माझा मुलगा आडवा पडला होता आणि अचानक त्याने एका दिशेने बोट दाखवत म्हटलं – ‘इथे राहू नकोस, निघून जा, तू इथून निघून जा.’ मी त्याला विचारलं, ‘तू कोणाशी बोलतोयस?’ काही क्षणांसाठी मीही घाबरलो. माझी पत्नी म्हणाली, ‘पाहिलंस ना, मी सांगितलं होतं ना, इथे काहीतरी आहे. तुझा मुलगाही कोणाशीतरी बोलतोय. नक्कीच काहीतरी गडबड आहे.’
‘Super Duper’ ट्रेलर रिलीज! कौटुंबिक गोंधळ, विनोद आणि भावनांचा धमाल संगम; कधी रिलीज होणार चित्रपट?
‘‘भूत बंगला’’च्या कास्टबद्दल बोलताना अक्षय कुमारने दिग्दर्शक प्रियदर्शन याच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दलही सांगितले. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन याची जोडी यापूर्वी ‘हेरा फेरी’, ‘भागम भाग’, ‘भूल भुलैया’, ‘गरम मसाला’ आणि ‘खट्टा मीठा’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता ही जोडी पुन्हा एकदा ‘भूत बंगला’मधून एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतपरेश रावल, राजपाल यादव, असरानी आणि वामिका गब्बी यांच्याही भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.