
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड स्टार रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अशी खळबळ उडवून दिली आहे की प्रेक्षक थक्क झाले आहेत. हा चित्रपट आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला लोकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तसेच बॉलीवूड आणि दाक्षिणात्य कलाकार दोघेही ‘धुरंधर २’ चे कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचे एक ट्विट समोर आले आहे, जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या ट्विटमुळे लोक भारावून गेले आहेत. अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊ.
राम चरणच्या ‘Peddi’च्या सेटवर क्रिकेटपटू तिलक वर्माची भेट; अभिनेत्याने बॅटवर दिला ऑटोग्राफ
अल्लू अर्जुनने केले तोंडभरून कौतुक
रणवीर सिंगचा चित्रपट ‘धुरंधर २’ प्रदर्शित झाल्यानंतर चाहते दुसऱ्या भागाचे आणि त्याच्या प्रभावाचे कौतुक करत आहेत, तसेच आता सेलिब्रिटींच्या सकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक ट्विट लिहिले आहे, “आत्ताच ‘धुरंधर २’ पाहिला – ‘स्वॅगसह देशभक्ती.’ प्रत्येक देशभक्ताला अभिमान वाटेल असा चित्रपट. प्रत्येकवेळी टाळ्या वाजवण्यासारखे क्षण! संपूर्ण टीमचे अभिनंदन. आर. माधवन आणि सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय… उत्कृष्ट तांत्रिक बाजू.” आपल्या देशात रणवीर सिंगसारखा एक हुशार आणि प्रतिभावान अभिनेता असल्याचा मला अभिमान आहे. आरव्हीएस जबरदस्त आहे.’ असे अभिनेत्याने लिहिले.
Just watched #Dhurandhar. A brilliantly made film filled with fine performances, the finest technical aspects, and amazing soundtracks. Magnetic presence by my brother @RanveerOfficial, he rocked the show with his versatility.
Charismatic aura by #AkshayeKhanna ji, and the… — Allu Arjun (@alluarjun) December 12, 2025
तसेच पुढे अल्लू अर्जुनने लिहिले, ‘आदित्य धर गारू यांनी कमाल केली आहे. आपल्याकडे त्यांच्यासारखा चित्रपट निर्माता असल्याचा मला आनंद आहे. एक भारतीय… आंतरराष्ट्रीय स्वॅग… जय हिंद.” तसेच अभिनेत्री प्रीती झिंटाने देखील एका विशेष स्क्रीनिंगमध्ये चित्रपट पाहिला आणि अर्जुन रामपाल आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. तिने लिहिले, “धुरंधर २ पाहिला आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, जर काही बदल करायचा असेल, तर तो धुरंधरसारखा असावा, नाहीतर नसावा. दिग्दर्शन, अभिनय, संगीत, संपादन, कथा, कास्टिंग, प्रत्येक विभाग अप्रतिम आहे. चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या आईने पहिली गोष्ट हीच सांगितली की तिला तो पुन्हा एकदा मित्रांसोबत थिएटरमध्ये पाहायचा आहे, आणि मलाही अगदी तसंच वाटतंय…”
‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने सर्व आवृत्त्यांसह, पेड प्रिव्ह्यू शोमधून ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करेल अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट जगभरात २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो, अशी चर्चा आहे. आता हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून, पुढे काय कमाई केली हे पाहण्यासाठी छते उत्सुक आहेत.