
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
लोकप्रिय टीव्ही व्यक्तिमत्व प्रिन्स नरुला सध्या चर्चेत आहे. ‘द ५०’ या शोमधील त्याच्या कार्यकाळात त्याने बरीच प्रसिद्धी मिळवली. मात्र, शोमधील अनेक माजी मित्रांशी त्याचे वादही झाले. अभिनेत्री दिव्या अग्रवाल आणि प्रिन्स नरुला एकमेकांना भाऊ-बहीण मानत असूनही त्यांच्यात वाद झाला होता. ‘द ५०’ च्या बाहेरही प्रिन्स नरुला आणि दिव्या अग्रवाल यांच्यातील दुरावा अजूनही मिटलेला नाही. एका मुलाखतीत प्रिन्स नरुलाने आपल्या दत्तक बहिणीला, “तू काहीच करू शकत नाहीस,” असे म्हणत टोमणा मारला होता. आता दिव्या अग्रवालनेही वक्तव्यावर प्रत्युत्तर देण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही.
प्रिन्स नरुलाने एका मुलाखतीत दिव्या अग्रवालबद्दल बोलताना म्हटले होते, “मी माझ्या बहिणीला सांगेन की तिने दोन पेग कमी प्यावेत. कारण तू जे बोलतेस, त्यावरून तू खरं बोलत आहेस की खोटं, हे स्पष्ट होत नाही.” दिव्या अग्रवालला त्याचे हे वक्तव्य अजिबात आवडले नाही. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी तयार करून प्रिन्स नरुलावर जोरदार टीका केली. अभिनेत्रीने लिहिले, “ही प्रसिद्धी कुठूनतरी दुसरीकडून मिळव. माझ्या भावा, थोडा शहाणा हो आणि एक चांगला माणूस बन.” एवढेच नाही, तर दिव्या अग्रवालने पुढच्याच ओळीत लिहिले, “मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही.”
Poonam Pandey लवकरच होणार आई ? बेबी बंपसोबत शेअर केलं फोटो; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
प्रिन्स नरुलाचा दिव्या अग्रवालसोबत पूर्वी वाद
हे लक्षात घेण्यासारखे आहे की दिव्या अग्रवालने प्रिन्स नरुलाला ‘दुतोंडी माणूस’ म्हटले होते. यावर उत्तर देताना प्रिन्स नरुला म्हणाला, “मला ती समजत नाही कारण मी तिला नेहमीच माझी बहीण मनात आलो आहे. पण तिच्याकडून पूर्वी चूक झाली आहे. ती माझ्याकडे आली, तिने माफी मागितली आणि मी तिला माफ केले. आम्ही यापूर्वीही गोष्टी मिटवल्या आहेत. जेव्हा ती शोमध्ये परत आली, तेव्हा तिने मला पुन्हा भाऊ म्हटले आणि ती नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली. आम्ही तिला पाठिंबा दिला, तिचे संरक्षण केले आणि ती गेममध्ये सुरक्षित राहील याची खात्री दिली.”