
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
राजपाल यादव तिहार तुरुंगात जाणार असल्याच्या बातमीने लोक अजूनही चिंतेत होते, आणि आता अशातच श्रेयस तळपदेही अडचणीत असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मैनपुरीतील भोगांवची आहे, जिथे अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीने या सर्वांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, १० फेब्रुवारी रोजी मैनपुरीच्या भोगांव पोलीस ठाण्यात चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोगांवच्या मोहल्ला मिश्राणा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने चित्रपट स्टार आणि त्याच्या साथीदारांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध एफआयआर
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. असा आरोप आहे की अभिनेताने त्याच्या साथीदारांसह शहरातील मोहल्ला मिश्राणा येथील मुंबई बँकेच्या शाखेत गुंतवणुकीच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केली. ज्या १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे ते म्हणजे समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके सेट्टी, संजय मुदगिल, शबाब हुसेन, श्रेयस तळपदे, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज जैन, अजय श्रीवास्तव आणि अरविंद त्रिपाठी या सगळ्यांची नावे आता समोर आली आहेत.
On February 10, the Bhogaon police station in Mainpuri registered a case of fraud against 12 others, including film actor Shreyas Talpade. A resident of Mohalla Mishrana in Bhogaon has accused the film star and other associates of defrauding him of lakhs of rupees under the guise… pic.twitter.com/yXDmQWHAtB — ANI (@ANI) February 11, 2026
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रतीनुसार, १४ जणांनी न्यायालयात तक्रार दाखल केली की, सागा ग्रुपचे संचालक समीर अग्रवाल आणि त्यांची पत्नी सानिया अग्रवाल यांनी २०१५ मध्ये त्यांच्या परिसरात एलयूसीसी बँकेची शाखा उघडली. त्यात शेकडो लोकांनी गुंतवणूक केली. परंतु जेव्हा लोकांनी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा समीरने ते परत करण्यास नकार दिला आणि त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. शिवाय, २०२४ मध्ये बँकेने आपले दरवाजे बंद केले.
या राज्यांमधील लोकांचीही बँकेने फसवणूक केली
पीडितांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे त्यांच्या ठेवींसाठी सर्व कागदपत्रे आहेत. लाखो रुपये बँकेत अडकले आहेत. बँक काम करत नसल्याने तेही त्रस्त होते. त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या बँकेवर केवळ मैनपुरीमध्येच नव्हे तर उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील शहरे आणि गावांमध्येही लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.