
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
छत्रपती शिवाजी महाराज आजही लोकांची प्रेरणा
‘व्हेरायटी’शी बोलताना रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रभावाबद्दल सांगितले. ते म्हणाले, “मराठी कुटुंबातील असल्याने, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा वाचत आणि ऐकत मोठे झालो. त्यांचे महत्त्व आजच्या पिढीसाठीही तितकेच खरे आहे. मला नाही वाटत की जगात त्यांच्यासारखे कोणी असेल. मी गुरू किंवा देवांबद्दल बोलत नाहीये. मी अशा एका राजाबद्दल बोलत आहे जो जवळपास ३५० वर्षांपूर्वी होऊन गेला, तरीही आजही लोक त्यांच्यासाठी सर्वस्व त्याग करण्यास तयार आहेत. ते आजही लोकांना प्रेरणा देत आहेत. एक असा राजा ज्याने एक अमर वारसा मागे ठेवला आहे, जो आजही प्रेरणा देत आहे.”
रितेश देशमुख यांना शिवाजी महाराजांची कथा मोठ्या स्तरावर सादर करायची आहे. चित्रपटाबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाले, “‘राजा शिवाजी’ हा एक मराठी द्विभाषिक चित्रपट आहे. आम्ही हा चित्रपट इतर भाषांमध्येही बनवण्याचा विचार करत आहोत. तो मोठ्या स्तरावर बनवणे हे आमचे ध्येय आहे. अनेकदा मराठी चित्रपटांची व्याप्ती मर्यादित असते. लोकसंख्येनुसार, महाराष्ट्रात अंदाजे १२० दशलक्ष लोक आहेत, त्यापैकी सुमारे १०० दशलक्ष लोक मराठी भाषिक आहेत. ही संख्या इतर अनेक राज्यांच्या किंवा देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. मात्र, बॉक्स ऑफिसचे आकडे हे दर्शवत नाहीत.”
आम्ही एक नवीन पैलू सांगण्याचा प्रयत्न करू
चित्रपटाची कथा आणि चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, “कथेची सुरुवात तो एक साक्षीदार असल्यापासून होते, त्यानंतर तो प्रश्न विचारू लागतो आणि शेवटी तो त्याच्या भविष्याबद्दल निर्णय घेतो. आम्ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पूर्णपणे वेगळा पैलू उलगडत आहोत. ही जितकी एक ऐतिहासिक गाथा आहे, तितकीच ती एक कौटुंबिक कथासुद्धा आहे. एका वडिलांची, मुलाची, पतीची आणि भावाची कथा. वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी त्यांचे निधन झाले, पण तोपर्यंत त्यांनी खूप काही साध्य केले होते. मी त्यांचे आयुष्य अडीच ते तीन तासांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”
Manish Malhotra Mother Dies: बॉलीवूडवर शोककळा! गुढीपाडव्याच्या दिवशीच मनिष मल्होत्राला मातृशोक
‘राजा शिवाजी’ कधी होणार प्रदर्शित?
‘राजा शिवाजी’मध्ये रितेश देशमुखने केवळ अभिनयच केला नाही, तर त्याचे दिग्दर्शन, लेखन आणि निर्मितीही केली आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, जेनेलिया देशमुख, फरदीन खान, महेश मांजरेकर, भाग्यश्री आणि सलमान खान यांच्यासह मोठा स्टारकास्ट आहे. सलमान खान या चित्रपटात केमिओ मध्ये दिसणार आहे. ‘राजा शिवाजी’ १ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.