
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड स्टार रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले आहेत. प्रेक्षक चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अवघ्या काही दिवसांतच ‘धुरंधर २’ ने २५० कोटींहून अधिक कमाई केली असून, ‘धुरंधर २’ ची लोकप्रियता जगभरात कायम आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार ‘धुरंधर २’ वर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, ज्येष्ठ चित्रपट निर्माते एस. एस. राजामौली यांनी आदित्य धरच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाचा आढावा घेतला आहे. तसेच हा चित्रपटाचा रिव्ह्यू देत दिग्दर्शक नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.
एस. एस. राजामौली यांनी केले कौतुक
सेलिब्रिटी सोशल मीडियावर रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आता, प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनीही या यादीत स्थान मिळवले आहे. राजामौली यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले, “मला ‘धुरंधर १’ खूप आवडला होता, पण ‘द रिव्हेंज’ने त्याला अधिक उंचीवर नेले आहे. लेखन, कलाकारांची निवड, तांत्रिक काम, संगीत, जगाची रचना आणि दिग्दर्शन हे सर्व अगदी परिपूर्ण आहे… पण त्याची खरी ताकद त्याच्या भावनिक खोलीत आहे.”
तसेच दिग्दर्शक यांनी पुढे लिहिले, “लेखनात असे वळण गुंफले आहे, जे अस्सल तणाव आणि भावनांनी भरलेले आहे. आदित्य धर, तू खूप छान काम केले आहेस. चार तासांचा चित्रपट बनवून प्रदर्शित करण्यासाठी धाडस लागते. प्रेक्षक शेवटच्या फ्रेमपर्यंत आपल्या जागेवर खिळून राहिले आहेत.” तसेच आता हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालता दिसत आहे.
राजामौली रणवीर सिंगबद्दल याबद्दल काय म्हणाले
राजमौली रणवीरची प्रशंसा करत म्हणाले, “रणवीर, काय अभिनय आहे यार… झोपडीतील बहिणीसोबतचा तो प्रसंग अभिनयाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सुरुवातीपासून ते हृदयद्रावक क्लायमॅक्सपर्यंत, तू हमजा आणि जस्कीरत दोघांनाही प्रभावित केले आहेस. माधवन गारू, तुम्ही सुद्धा एक जबरदस्त अभिनय केला आहे.” राजामौलींच्या या प्रशंसेमुळे चित्रपटाची चर्चा आणखी वाढली आहे. ‘धुरंधर २’ आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. विजय देवराकोंडा, महेश बाबू, अल्लू अर्जुन आणि ज्युनियर एनटीआर यांनीही ‘धुरंधर २’ चे कौतुक केले आहे.