
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
विशेष म्हणजे, मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त हा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. त्यांच्या दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे या चित्रपटाबद्दल आधीपासूनच अपेक्षा वाढल्या आहेत. पोस्टर पाहून हा चित्रपट एक थरारक आणि सस्पेन्सने भरलेला अनुभव देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’चित्रपटाचे पहिलं पोस्टर रिलीज
‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच रिव्हील करण्यात आला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.पोस्टरमध्ये मनोज बाजपेयी पाठमोरे दिसत आहेत, हातात सूटकेस घेऊन ते एका कॉरिडॉरमधून चालताना दाखवले गेले आहेत. त्यांच्या मागे असलेली टॅगलाईन लक्ष वेधून घेते. “जर मी अपयशी ठरलो… तर इंडिया अपयशी ठरेल.” ही ओळ एका हाय-स्टेक्स लीगल ड्रामाची झलक देणारी आहे.दुसऱ्या पोस्टरमध्ये हिरव्या रंगाची एक खुर्ची दाखवण्यात आली असून त्यावर “इंडिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे” आणि “ही फक्त खुर्ची नाही… जबाबदारी आहे” अशा प्रभावी टॅगलाईन्स आहेत. या दृश्यांमधून देशाशी संबंधित गंभीर आणि थरारक कथानकाची स्पष्ट झलक मिळते.
हा चित्रपट विपुल अमृतलाल शाह आणि मनोज बाजपेयी यांचा पहिला एकत्रित प्रोजेक्ट आहे. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते एकत्र येत असल्याने या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. ‘सनशाईन पिक्चर्स’च्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट एक इंटेन्स आणि विचार करायला लावणारा ड्रामा ठरणार आहे.
मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवशी खास भेट
मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर रिलीज करण्यात आल्याने हा क्षण आणखी खास बनला असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
या चित्रपटासोबत विपुल अमृतलाल शाह पुन्हा एकदा एक दमदार कथा घेऊन येत आहेत. तसेच, मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवशी पोस्टर रिलीज करण्याची ही पद्धत साऊथ इंडस्ट्रीतील त्या ट्रेंडची आठवण करून देते, जिथे कलाकारांच्या वाढदिवशी त्यांच्या चित्रपटांच्या खास झलक शेअर केल्या जातात आणि हा दिवस चाहत्यांसाठी अधिक खास बनवला जातो.
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरला दिग्गजांकडून दाद; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला
‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’ हा चित्रपट विपुल अमृतलाल शाह यांनी प्रोड्यूस केला असून ‘सनशाईन पिक्चर्स’तर्फे सादर करण्यात येत आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते आशिन ए. शाह आहेत. चित्रपटाची कथा सुवेंदू भट्टाचार्जी, सौरभ भरत, रवि असरानी आणि विपुल अमृतलाल शाह यांनी मिळून लिहिली आहे. जावेद अख्तर यांच्या गीतांसह चित्रपटाचे संगीत अमित त्रिवेदी यांनी दिले आहे.लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये त्याबाबतची उत्सुकता अधिकच वाढताना दिसत आहे.