(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
साऊथ सुपरस्टार अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचा प्रमुख विजयच्या रॅलीमध्ये नुकतीच चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या रॅलीमध्ये ३३ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रॅलीमध्ये उपस्थित असलेले अनेक लोक जखमी देखील झाले आहेत. तसेच, जखमी झालेल्या लोकांना ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणि त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक
थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील करूर येथे थलपति अभिनेता विजयच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होत. या रॅलीत लाखो लोकांची गर्दी जमा झालेली दिसली. अभिनेता विजय हे एका व्हॅनवर उभे राहून रॅलीत सामील झाले होते. आणि लोकांना प्रतिसाद देत होते. रस्त्यावरून रॅली जात असताना अभिनेता भाषण देखील करताना दिसला. त्याच दरम्यान एक मुलगा हरवला असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ही माहिती दिली. विजय यांनी माईकवरून एक मुलगा हरवला आहे, तो शोधण्यासाठी मदत करा अशी घोषणा लोकांना केली. पोलिसांना सहकार्य करा अशी सुचना कार्यकर्त्यांनी दिली आणि स्टेजवरून खाली उतरले. त्यानंतर गर्दीमध्ये एकाच गोंधळ उडाला. गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडले. तर काही जण गर्दीत दबले गेले. अचानक झालेल्या या घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजले. यामध्ये मुलं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक लोक बेशुद्ध पडले.
वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या विजयने परिस्थिती पाहून लगेचच आपलं भाषण थांबवलं आणि स्टेजवरून पाण्याच्या बाटल्या गर्दीकडे फेकून मदत करण्याचा प्रयत्न केला. गर्दीतून जाण्यासाठी रुग्णवाहिकांना बरीच अडचण आली. बेशुद्ध झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन
विजयच्या रॅलीमध्ये लोकांचा मोठा जमाव
तामिळनाडू वेत्री कळघम (TVK) चे प्रमुख विजय यांच्या नमक्कल आणि करूर येथील निवडणूक रॅलींना मोठी गर्दी झाली होती. विजयने रॅलींदरम्यान द्रमुक आणि एआयएडीएमकेवर जोरदार हल्ला चढवला. अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा पक्ष भाजपशी युती करणार नाही आणि खोटी आश्वासनं देणार नाही. रस्ते, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षा यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्याने केला. ‘२०२६ मध्ये खरी लढत द्रमुक आणि टीव्हीके यांच्यात होईल, जिथे भ्रष्ट प्रशासनाविरुद्ध जनतेची शक्ती लढवली जाईल. अभिनेत्याने जाहीर केलं की ते दर शनिवारी राज्यातील विधानसभा मतदारसंघांना भेट देतील.’ असे विजय म्हणताना दिसला.
करूर अपघातावर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी करूर घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट केलं की, त्यांनी माजी मंत्री व्ही. सेंथिलबालाजी, आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम आणि जिल्हाधिकाऱ्यांना बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांना त्वरित उपचार देण्याचे निर्देश दिले. त्यांनी तिरुचिरापल्लीचे मंत्री अनबिल महेश यांना मदत कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देखील दिले. मुख्यमंत्र्यांनी एडीजीपींना परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी जलद कारवाई करण्यास सांगितले. त्यांनी जनतेला डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.