
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. २६ फेब्रुवारी रोजी जयपूरमध्ये झालेल्या या भव्य समारंभाचे फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. चाहते विजयच्या लग्नाने आनंदित झाले आहेत, तर विजयच्या काकांनी आणखी एका पैलूबद्दल अभिनेत्याचे कौतुक केले आहे. त्यांनी विजयच्या वाढदिवसानिमित्त त्याचे अनेक फोटो शेअर केले आणि एका पोस्टसह भावुक कॅप्शन देखील दिलेले दिसले आहे. अभिनेत्याचे काका आता नक्की काय म्हणले हे आपण जाणून घेणार आहोत.
काकांनी पोस्टमध्ये काय आहे?
विजयचे काका रंगिनेनी यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये विजय खूपच नम्र दिसत आहे. लग्नानंतर तो त्याच्या आजी-आजोबांच्या घरी गेला आहे, तिथे त्याने त्याच्या दिवंगत आजी-आजोबांना श्रद्धांजली वाहिली. तसेच फोटोमध्ये त्याचे कुटुंब देखील दिसत आहे. अशातच काकांच्या कॅप्शनने चाहत्यांचे मन जिंकले आहे. सोशल मीडियावर त्यांची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
The world sees the flamboyance. I see the humility — the side I cherish most.
Beyond the glitz and applause, he remains rooted in values, returning to our village to bow his head and seek his maternal grandparents’ blessings 🙏#ViroshWedding #VijayDeverakonda #RashmikaMandanna pic.twitter.com/1RxlqWvVVt — Yash Rangineni (@YashBigBen) March 5, 2026
काकांनी विजय देवेराकोंडाचे कौतुक करत लिहिले, “जगाला दिखावा दिसतो, पण मला त्याची नम्रता दिसते. हाच तो गुण आहे जो मला सर्वाधिक जपावा वाटतो. प्रसिद्धी आणि टाळ्यांच्या गजरापलीकडेही तो आपल्या मूल्यांशी घट्ट जोडलेला आहे. आमच्या गावात परतल्यावर तो नम्रपणे डोके झुकवून आपल्या आजी-आजोबांचे आशीर्वाद घेतो आहे.”
“लाज वाटायला हवी…” Anurag Dobhal च्या अपघातानंतर सोशल मीडियावर संताप, Aly Goni ने ट्रोलर्सना सुनावले
लग्नानंतर हे जोडपे गावी गेले
२६ फेब्रुवारी रोजी लग्नानंतर, हे जोडपे तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील विजयच्या मूळ गावी थुम्मनपेटा येथे परतले. या समारंभात, नवविवाहित जोडप्याने लग्नानंतरच्या विधींनुसार त्यांच्या घरी सत्यनारायण व्रत केले. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांसाठी त्यांनी जेवणाचे आयोजन देखील केले. लग्नानंतर ४ मार्च रोजी या जोडप्याने हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजन केले होते. रिसेप्शनला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक सार्वजनिक व्यक्तींनी विजय आणि रश्मिकाच्या लग्नाबद्दल अभिनंदन संदेश पाठवले.