Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

आज सातारा जिल्ह्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडला आहे. या संमेलना मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थितीत पाहायला मिळाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 02, 2026 | 02:11 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सातारा/तेजस भागवत: आज सातारा जिल्ह्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले यांनी उपस्थिताना संबोधित केले.

आज साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समेलनाध्यक्ष विश्वास पाटील, मिलिंद जोशी, मंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले आणि अन्य ज्येष्ठ मंत्री आणि मान्यवर उपस्थित राहिले आहेत. आज दुपारी हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षयेखाली कवीसमेलन आयोजित करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. या वेळी पोलीस बँडने राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन मानवंदना दिली. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यावेळी उपस्थित होते.

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छत्रपती शिवेंद्रराजे सिंह भोसले म्हणाले, ‘आज सातारा जिल्ह्यात साहित्यिकांचा कुंभमेळा भरला आहे. याचा मला खूप आनंद आहे. आजच्या या संमेलनात कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे.’ पुढे बोलताना मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले म्हणाले, ‘अखिल भारतीय साहित्य समेलन साताऱ्यात व्हावे यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत होतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालयावर होणारे हे पहिले समेलन आहे. माझे वडील छत्रपती अभयसिंहराजे भोसले हे ६६ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यानंतर आज ९९ व्या संमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याची संधी मला प्राप्त झाली.”

“सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. मराठेशाही, लष्करात भरती होणारे तरुण अशी या सातारा जिल्ह्याची ओळख आहे. सातारा जिल्ह्याने अनेक साहित्यिक दिले. भाषेसाठी आंदोलन करणारा मी पहिलाच लोकप्रतिनिधी ठरलो. सातारा जिल्हा हे सांस्कृतिक केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहोत,” असे शिवेंद्रराजे सिंह भोसले म्हणाले.

 

 

Web Title: Comments by shivendrasinhraje bhosale the chairman of the reception committee of the all india marathi literary conference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?
1

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई
2

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं
3

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप
4

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.