
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवर नुकतीच मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. यामी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळतोय. विशेष करुन या मालिकेतील लहानग्या सावित्रीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सावित्रीबाईंचा ठाम निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ, अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या सगळ्या गुणांचा प्रत्यय लहानग्या सावित्रीने साकारलेल्या प्रत्येक प्रसंगात जिवंत होते.
ही भूमिका साकारणारी गुणी बालकलाकार तक्षा शेट्टी हिने आपल्या सहज अभिनयातून सावित्रीबाईंचं बालपण अतिशय प्रामाणिकपणे साकारलं आहे.तिच्या निरागस डोळ्यांत दिसणारा प्रश्नार्थक भाव, अन्यायाविरोधात उभं राहण्याची धडपड, शिक्षणासाठी असलेली आंतरिक जिद्द आणि स्वप्न पाहण्याचं धाडस या सगळ्यांतून भावी क्रांतीची चाहूल मिळते.
सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखलेही छोट्या सावित्रीचा अभिनय पाहून भारावून गेली आहे. छोट्या सावित्रीचं कौतुक करताना मधुराणी म्हणाल्या, ‘छोट्या सावित्रीची चुणूक आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी लागणारी ऊर्जा तक्षाने सहजरित्या पकडली आहे. मला प्रचंड अभिमान वाटतो तिचा अभिनय पहाताना. तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा माझ्याच छोट्या रुपाला भेटल्याचा भास झाला. इतक्या लहान वयातही तिची मेहनत, तिचं शिस्तबद्ध काम, तिची मेहनती वृत्ती आणि प्रत्येक सीनबद्दलची तळमळ खरंच वाखाणण्यासारखी आहे. ती फक्त भूमिका साकारत नाही, तर ती ती भूमिका मनापासून जगते. हे खरंच वाखाणण्यासारखं आणि कौतुकास्पद आहे.
“मी सावित्रीबाई जोतीराव फुले” ही प्रेरणादायी बायोग्राफिकल मालिका आहे, जी भारतातील पहिल्या महिला शिक्षक आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. मालिकेत सावित्रीबाईंच्या बालपणापासून ते मोठी झाल्यावर शिक्षण आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी केलेल्या संघर्षाचा सुंदर अनुभव दिला आहे. लहान सावित्रीबाईची भूमिका साकारत असलेल्या तक्षा शेट्टीच्या अभिनयामुळे तिच्या निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद प्रेक्षकांच्या समोर अत्यंत प्रभावीरीत्या उभारी मिळते. मालिकेत शिक्षणासाठी असलेली जिद्द, समाजासाठी काहीतरी करायची प्रेरणा आणि स्वप्न पाहण्याची धाडस यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो, ज्यामुळे ही मालिका महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत आहे.