
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी, गूढतेने वेढलेली आणि प्रेक्षकांच्या मनात पहिल्या पोस्टरपासूनच कुतूहल निर्माण करणारी ‘तुंबाडची मंजुळा’ हा मराठी चित्रपट आता अधिक चर्चेत आली आहे. झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचा धमाल आणि उत्कंठावर्धक टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
५ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टिझरमध्ये ‘मंजुळा’ या नावाभोवती निर्माण झालेलं गूढ वातावरण, गावकऱ्यांमध्ये पसरलेली भीती आणि त्यातून उडालेली तारांबळ प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. कोकणातील एका गावाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात एकाहून एक सरस आणि वेगळ्या भूमिकेत कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. यात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, अथर्व रुके, प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी यांचा समावेश आहे.
‘तारक मेहता का…’ फेम Disha Vakani वर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने भावुक झाली अभिनेत्री
यातही एका भविष्य सांगणाऱ्या गुरुजीच्या वेशात दिसणारे मकरंद अनासपुरे यांचा लुक, त्यांची देहबोली आणि संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच सगळ्यात जास्त आकर्षणाचा विषय ठरली आहे टीझरच्या शेवटी एका अर्धवट बंद दाराआड उभी दिसणारी सई ताम्हणकर. यामध्ये सईची काय भूमिका असेल ? याबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे.
या चित्रपटाविषयी झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, “यापूर्वी प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता कशी वाढेल यावर आम्ही भर दिला. आता प्रदर्शित झालेल्या टिझरमधून दिसणारी कलाकारांची फौज, त्यांचे धमाल संवाद हे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मुळात कोकण प्रांत आणि कोकणातील लोकांच्या गजाली हा कायमच आपल्या आवडीचा विषय असतो. कोकणातील अशाच एका गावाची, त्यातील गावकऱ्यांची आणि गावात घडणाऱ्या एका अद्भुत घटनेची गोष्ट म्हणजे तुंबाडची मंजुळा हा चित्रपट. सर्वच स्तरांतील, वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल आणि सहकुटुंब बघता येईल असा हा मनोरंजक चित्रपट झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर झी स्टुडिओजने पूर्णपणे निर्मितीची धुरा सांभाळली आहे याचा आनंद आहे.” असे ते म्हणाले आहे.
‘सरके चुनर’ गाण्यामुळे वाढल्या संजय दत्त आणि नोराच्या अडचणी; राष्ट्रीय महिला आयोग कडून बजावले समन्स
ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केले आहे. झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ५ जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.