
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
उमेश आणि प्रिया ही जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या अगदी जवळची आणि आपुलकीची वाटली आहे. अशातच या दोघांची आगामी वेब सीरिज ‘हे काय नवीन?’ झी ५ वर स्ट्रीम झाली आहे. या आगामी वेब सीरिजमधून या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या वेब सीरिजची कथा थोडी वेगळी आणि हटके असून, चाहत्यांना ही प्रगल्भ नात्याची गोष्ट भावली आहे.
“आणि काय हवं” पासून “हे काय नवीन?” पर्यंत या जोडप्याचा प्रवास कसा झाला आहे? हे या कथेमध्ये पाहायला मिळाले आहे. “आणि काय हवं” ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता “हे काय नवीन?” देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता हे जोडपं चाळिशीत असल्याचे दिसून आले आहे. जास्त प्रगल्भ, वास्तवातील समस्या, प्रश्न आणि जबाबदाऱ्या यांचा सामना करत आहेत. या प्रवासाची खरी झलक म्हणजे, ते या सगळ्या परिस्थितींना एकत्र कसं सामोरं जातात थोड्या विनोदाने, उबदारपणाने आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत. हे सगळं वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
Nawazuddin Siddiqui यांच्या ‘मैं एक्टर नहीं हूं’चा टीझर रिलीज; चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
“हे काय नवीन?” ची काय आहे कथा ?
“हे काय नवीन?” मध्ये प्रिया बापटने रमा हे पात्र साकारलं आहे. तसेच, उमेशने आदित्यचं पात्र साकारले आहे. हे दोन्ही जोडपं वयाच्या चाळिशीत पोहचले आहे. येथून सुरु होणार त्यांचा नवा प्रवास या कथेत पाहायला मिळाला आहे. जिथे रमा आणि आदित्यचं नातं केवळ प्रेमापुरतं मर्यादित राहत नाही, तर जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि वैयक्तिक निर्णय यांचाही तितकाच प्रभाव दिसून येतो.
रमा आणि आदित्य या दोघांकडूनही त्यांच्या कुटुंबाला बाळाची अपेक्षा असते, परंतु या दोघांनाही ते नको असते. कथेच्या पुढे रमा आपला स्वतःचा व्यवसाय करायचे ठरवते. आणि तो लगेच सुरूही करते. परंतु, हे सगळं सुरु होताना झालेला गोंधळ, तिचे कुटुंबासोबत बाळावरून झालेले वाद, आणि या सगळ्यामुळे तिच्यात आणि आदित्यच्या नात्यात होणार दुरावा. हे सगळं कथेत नव्या पद्धतीत मांडण्यात आले आहे.
वरुण नार्वेकर यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. वरुण नार्वेकर यांच्या लेखनाने सध्याच्या दैनंदिन नात्यांकडे पाहण्याची या नव्या पिढीची नजर आणि त्यातून प्रामाणिक भावनांचे बारकावे त्यांनी आगामी अचूक मांडले आहेत. कथेत विनोद आणि संवेदनशीलता देखील खूप उठून दिसते आहे. वेब सीरिज आज झी 5 मराठीवर प्रदर्शित झाली असून उमेश आणि प्रिया यांची केमेस्ट्री पुन्हा प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी त्यांच्या भूमिकांमध्ये प्रचंड सहजता आणली आहे. दोघांमधील केमेस्ट्री ही या सीरिजची सर्वात मोठी ताकद ठरते. त्यांच्या संवादांमध्ये वास्तवतेचा स्पर्श आहे, जो प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्यातील क्षणांची आठवण करून देतो.
‘हे काय नवीन?’ ही केवळ एक प्रेमकथा नाही, तर नात्यांच्या बदलत्या परिभाषेची गोष्ट आहे. आजच्या पिढीतील जोडप्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना ही सीरिज थेट भिडते. उमेश आणि प्रिया यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही कथा अधिक जिवंत वाटते.