दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख आणि आमिर हळहळला; भाईजान म्हणाला, "निर्दोष व्यक्तीला मारणं म्हणजे..."
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांवर निशाणा साधण्यात आला. २२ एप्रिलला झालेल्या ह्या हल्ल्यामध्ये २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ने घेतली होती. त्या मृत पावलेल्या २६ पर्यटकांमध्ये, दोन विदेशी, दोन स्थानिक आणि २२ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या सेटवर ‘त्या’ दुर्दैवी घटनेनंतर काय घडलं? स्वत: रितेश देशमुखने दिली माहिती
या घटनेवर सध्या देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. आता या भ्याड हल्ल्यावर शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पोस्ट शेअर केलेली आहे. सलमान खान त्याच्या X अकाऊंटवर पोस्ट शेअर करत केलं आहे. “पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला नरकात बदललं जात आहे. निर्दोष लोकांना लक्ष्य केलं जात आहे. एकाही निर्दोष व्यक्तीला मारणं हे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखं आहे.”, असं सलमानने म्हटलं आहे.
Kashmir,heaven on planet earth turning into hell. Innocent people being targeted, my heart goes out to their families . Ek bhi innocent ko marna puri kainath ko marne ke barabar hai
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 23, 2025
Elvish Yadav ने राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन मागितली माफी, नेमकं काय प्रकरण?
शाहरुख खानने जम्मू काश्मीरमधील या दहशतवादी हल्ल्यावर दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेत्याने X अकाऊंटवरुन ट्वीट करत जीव गमावलेल्या निर्दोष लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तो म्हणतो, “पहलगाममध्ये झालेल्या हिंसाचाराच्या कपटी आणि अमानवी कृत्याबद्दलचे दुःख आणि राग शब्दात व्यक्त करता येत नाही. अशा कठीण काळात आपण फक्त पीडित कुटुंबीयांसाठी प्रार्थना करू शकतो. एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र उभं राहिलं पाहिजे. आणि या घृणास्पद कृत्याविरोधात न्याय मिळाला पाहिजे”, असं शाहरुखने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Words fail to express the sadness and anger at the treachery and inhumane act of violence that has occurred in Pahalgam. In times like these, one can only turn to God and say a prayer for the families that suffered and express my deepest condolences. May we as a Nation, stand…
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 23, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; दिग्दर्शकाची मन सुन्न करणारी पोस्ट
दुसरीकडे, आमिर खानच्या टीमकडूनही त्याच्या X अकाऊंटवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. आमिर खान प्रॉडक्शनने ट्विटरवर लिहिले की, “पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. शिवाय या हल्ल्यात अनेकांना वेदना आणि यातनाही झाल्या आहेत. आमच्या संवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.
We are deeply shocked and saddened by the recent terror attack in Pahalgam that has claimed innocent lives and brought pain and sorrow to so many.
Our thoughts are with the victims and their families.
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) April 23, 2025
मेघना सिंह आणि शंतनु चौधरीच्या लग्नात राजकारणी आणि सिनेतारकांची मांदियाळी; वाचा यादी